शिवाजीची समथस सनद
१८९
बरा नव्हे. आम्ही तरी वडीलपणे आजीवरी १८ तुम्हांला सांगितलें आतांही सांगतो. एकाल तरी वरें, तुम्हीच सुख पावाल, नाइकाल तरी तुम्हींच कष्टी व्हाल आमचे काय चालतें ?
वहुत काय लिहिणे. मर्यादेयं विराजते.
१७.: ।। शिवाजीची समथास सनद
श्रीरामदासवचनामृत,
( आश्विन शु० १० पृ. १९९-२००
शके १६०० [ समर्थ-शिवाजी यांचे परस्पर संबंध लक्षांत येण्यास हा उतारा उपयुक्त आहे. ]
श्रीरघुपती ।
श्रीमारुती श्रीसद्गुरुवर्य श्रीसकळतीर्थरुप श्रीकैवल्यधाम
श्रीमहाराज स्वामीचे सेवेसीं-- चरणरज शिवाजी राजे यांनी चरणाबरी मस्तक ठेऊन विज्ञापन जे मजवर कृपा करुनु सनाथ केले. आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून घर्गस्थापना, देव-ब्राह्मणाची सेवा, प्रजेची पीडा दूर करुनु पाळण, रक्षण करावे; हे व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्हीं जें मनीं धराल तें श्रीसिद्धीस पाववील. त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक (पाठभेददुराढे) लोकांचा नाश करावा, विपुल द्रव्ये करुनु राज्यपरंपरा अक्षइ चालेल
१८. आजवर. १ मोक्षाचे माहेरघर. २ पायाची धूळ. ३ की, ४ यावरून राज्यस्थापनेचा उद्योग सुरू करण्यापूर्वी, निदान त्यास मोठे स्वरूप येण्यापूर्वीच समर्थ-शिवाजी भेट झाली असली पाहिजे हे उघड आहे; यानंतर कित्येक वर्षांनीं चाफळ येथे श्रीरामाची स्थापना झाली त्यानंतर हे पत्र लिहिले गेले आहे. समर्थ-शिवाजीसंबंधाची त्रोटक परंतु मुद्देसूद चची प्रा. रानडे यांनी रामदासर्वचनामृताच्या प्रस्तावनेत केलेली आहे.
[ ३३
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/218
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
