पन्नास वर्षांपूर्वीचे पुत्रे
३३३
घरकामासाठी तीन वजतां उठावें लागे
त्या काळा बायकाना उजाडापयत झोपून राहतां येत नसे. घरांत कामें
करण्यासाठी त्यांना पहाटे तीन वाजतां उठावें लागे व प्रथम दळण घरीच
करावें लागे. चार वाजेपर्यंत प्रत्येक घरांत गाण्याचे सूर व जात्याची घरघर
त्या वेळीं ऐकू येई व चार वाजले कीं, बायका पाण्यासाठी बाहेर पडत.
कारण ५u। वाजण्याचे आंत निदान ब्राह्मणेतर बायकांना तरी पाणी
उरकावें लागे.
त्या वेळीं प्रत्येक पेठेत दोन तरी हौद असत व या दोन हौदांवर सर्व
पेठेचे पाणी भरणे चालेया हौदांवर ५ वाजतां ब्राह्मण पुरुष स्नानासाठा
येत व त्या वेळीं मात्र बायकांनीं तिकडे फिरकावयाचें नाहीं, येवढंच काय पण
ब्राह्मणेतर पुरुषांनी तेथे पाण्याला किंवा आंघोळीला जावयाचें नाहीं असा
परिपाठ असे व तो आळीकर मंडळी मोठ्या आस्थेने पाळीत. ब्राह्मण मंडळी
देवाची प्रार्थना करण्यासाठीं हैं करतात व त्यांना हें कई दिल्याने आप
णालाहि पुण्य लागतें असें सर्वांना बाटेम्हणून कोणी त्या वेळीं ब्राह्मणांचे
वाटेसच जात नसत. ८ च्या सुमारास ब्राह्मण मंडळी होदावरून जात व
मग सर्व जातींचे या हौदावर पाणी भरणे वगैरे व्यवहार चालत असत.
त्या वेळीं सदासर्वकाळ पुण्यांतील हौदांतून पाणी वहात असे व हे हौद दर
महिन्याला वर्गणी काढून स्वच्छ केले जात.
विधवांना या हौदांवर पाणी भरण्यास परवानगी नसे व ब्राह्मण स्नान
करीत असतांना कोणीहि विधवेनें समोर जावयाचें नाहीं असा नियम' असे.
संध्याकाळी ५ वाजतां पण ब्राह्मण अयं देण्यासाठी या हौदांवर येत,
त्या वेळींहि हाच नियम पाळला जाई
पैशाच्या कबडवांत बाजारहाट
त्या वेळीं कवडया व्यवहारासाठी बाजारांत चालत व या कवड्या
घेऊन शनिवारवाड्याच्या जवळच्या बाजारात मुलें विक्रीसाठीं बसत. एका
पेशाला त्या वेळीं ९६ कवडच मिळत व तेवढया कवड्या घेऊन बाजारांत
[ ७९
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६१
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
