पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





दोन प्रवाह


 हिंदुसमाज समाज आहे काय, त्याला प्राचीन काळी तरी काही संघटनातत्त्व होते काय, या प्रश्नांचा विचार गेल्या दोन प्रकरणांत आपण केला. अखिल भारतात बसत असलेल्या शेकडो जमातींना एकरूपता आणून त्या प्रचंड मानवसमूहातून एक संघटित समाज निर्माण करण्याचे प्रयत्न त्या काळच्या समाजधुरीणांनी- आर्यांनी- निश्चित केले होते आणि त्यांना त्यांत यशही तसेच स्पृहणीय आले होते असे त्यावरून आपल्याला दिसले. आणि याच प्रयत्नातून भारतात प्रथम यज्ञधर्मनिष्ठा व तीतून पुढे राष्ट्रनिष्ठा विकसित होऊन हा समाज अत्यंत बलशाली झाला, अमोघ पराक्रम करू शकला असेही आपल्याला दिसून आले. राष्ट्रनिष्ठा या संघटनतत्त्वाच्या सामर्थ्यामुळेच इ. स. पू. ३२३ पासून पुढील एक हजार वर्षांत ग्रीक, शक, कुशाण, हूण इ. सुसंस्कृत वा रानटी जमातींची जी ९।१० आक्रमणे भारतावर आली, ज्या आक्रमणांमुळे युरोपीय संस्कृती नष्ट होण्याची वेळ आली होती, त्यांना तोंड देऊन त्यांचे निर्दाळण करण्यास भारत समर्थ झाला, असा त्यांतून निघणारा निष्कर्षही आपण ध्यानी घेतला. हा निष्कर्ष सर्वमान्य होईल अशी आशा वाटते.

आरब आक्रमणे

 भारताच्या ठायी असे सुसंघटित सामर्थ्य असल्यामुळेच इ. सनाच्या आठव्या