या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मृत्यूव पथे
आभाळ कोसळून जावं, नि मग आकाशाचा रेशमी पोत मंदपणे झुलत राहावा तसं मन, निरभ्र सुस्नात.
असीम एव्हाना दूर पोचला असेल. कदाचित पोलिसांच्या गोळयांनी छिन्नभिन्न होऊन चिखलात पसरला असेल. सारे प्रसंग कसे स्वच्छ आठवताहेत.
मनीष परवाच कलकत्त्याला गेला आहे. पैसे आणायचेत. शिवाय बरीन् चा खून कुणी केला त्याचे धागेही शोधायला हवेत.
...आठ दिवसांपूर्वीच बरीन् आला होता. या वेळी फार बोलला. खूप थकलेला, तळापासून उखडून आलेला, असा.
"रीनादी, आज या क्षणी वाटतयं, सारं व्यर्थ आहे. कैक खून केले. रक्तानं हातमाखून घेतले. शत्रू निपटून काढला की क्षणभर वाटायचं, आपण जिंकलो ... पण क्षणभरच ! मग पुन्हा पाठलाग चुकवीत अखंड धावणं. प्रत्येक क्षण मृत्यूच्या जवळिकेचा.
मृत्यूव पथे / ८३