तीन चार दिवस जगायचं नि पुन्हा अंधार सोसायसाठी निघून जायचं.
मी हा प्रश्न विचारायला नको होता.
पण उद्याच्या वेदनांची चित्रं मनासमोर पिंगायला लागतात आणि मग हे सुख सोसवेनासं होतं.
मी तृप्त होऊन जातो! इथून परतताना माझ्या मनाचे पिसार फुलारून येतात !! तरीही.. मी सतरा वर्षापूर्वी तुला दिलेली निळी साडी नेसून तू एअर पोर्टवर आलेली असतेस. मला माहीत असतं की तुझ्या उसन्या हसण्यामागं प्रचंड थैमान आहे अश्रूचं. अश्रू, जे. मी माझ्या हातांनी निर्माण केले.
त्या अदृश्य अधूंनी माझ्या तृप्त रक्ताच्या साऱ्या जखमा उलून येतात.
वाटतं, स्वतःलाच संपवून टाकलं तर सगळ्या यातना...
मी हा प्रश्न विचारायला नको होता...
पण आज विचारावासा वाटला. गेली सात वर्ष हा प्रश्न मनात निर्माणच झाला नाही.
पण यावेळी फार असुरक्षित वाटतंय.
हे इथं असं किती वर्ष यायचं ? का यायचं?
रक्तात गुलमोहरी बसंत फुलवून घेण्यासाठी केवळ यायचं ? की दोन हजार मैलांवर घरकुलातले व्यवहार सांभाळणारा तू फक्त माझाच आहेस या जाणिवांचे आभाळ कवेत घेऊन तृप्त होण्यासाठी इथं यायचं ?
रक्त खरं की मनाचं आभाळ खरं ?
आज प्रत्येक क्षण हातातून सुटलेला...... असुरक्षित वाटतोय...
पान:स्वरांत.pdf/१७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८ /स्वरांत