पान:सौंदर्यरस.pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८४
सौंदर्यरस
 

अज्ञानतिमिरांधस्थ लोकस्त तु विचेष्टत:
ज्ञानांजन शलाकाभिर्नेत्रोन्मीलन कारणम् ।

 महाभारत लिहिण्याचा व्यासांनी हा हेतू सांगितला आहे. अज्ञान-तिमिराने लोक अंध होऊन चाचपडत असतात. त्यांच्या डोळ्यांत ज्ञानांजन घालून ते उघडावे हे व्यासांचे उद्दिष्ट होते. हरिभाऊंचे उद्दिष्टही तेच होते. वास्तवाचे ज्ञान समाजाला त्यांनी करून दिले ते त्याचे डोळे उघडावे व त्याला ध्येयाचे दर्शन घडवावे यासाठी. त्यांचा वास्तववाद असा ध्येयदर्शी होता. केवळ सत्यदर्शी नव्हता. जगातले अक्षरसाहित्य ज्याने वाचले आहे त्याला हाच वास्तववाद श्रेष्ठ होय हे सांगावयास नकोच.