पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काहीच करत नाही. पण तो जर काढून घेतला तर इमारत कोसळते. त्याचप्रमाणे ऊर्जाचक्र शांत नसेल, स्वस्थ नसेल तर त्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व अवयव कोसळून पडतात. एखाद्याला डोळे आहेत पण तो पाहू शकत नाही किंवा पाय आहेत पण चालण्याची क्षमता नाही. अशी उदाहरणे आपण बरीच बघतो. या ऊर्जाचक्राचे स्वास्थ्य किंवा कार्यक्षमता त्याला मिळणाऱ्या प्राणतत्त्वावर अवलंबून असते. सूर्यनमस्कारातून त्यांना हा खुराक अधिक प्रमाणात मिळतो. त्यांना तो मिळविण्यासाठी आपण जाणिवपूर्वक मदत करायची आहे. सूर्यनमस्काराच्या सरावामध्ये शरीरातील सात ऊर्जाचक्रांपैकी पाच ऊर्जाचक्र कार्यरत होतात. मुलाधार चक्र मात्र शांत ठेवणे, तेथील स्नायू मोकळे ठेवणे, त्या स्नायूंवर ताण किंवा दाब येणार नाही याकडे लक्ष देणे हे सर्वात महत्त्वाचे. मूलाधार चक्राचा प्रत्यक्ष सहभाग सूर्यनमस्कारामध्ये होत नाही. सहस्त्राधार चक्राचे केंद्र शरीरात नाही. ते ऊर्ध्व दिशेला कोठेतरी आहे. या चक्राचे संचलन वैश्विक शक्ती करत असते. ही दोन ऊर्जाचक्र अध्यात्म मार्गातील किंवा कुंडलिनीशक्ती जागृत करण्याच्या प्रक्रियेतील महाद्वारे आहेत. अर्थात शरीरातील इतर पाच ऊर्जाचक्र कार्यक्षम झाल्याशिवाय कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. म्हणूनच आपण या पाच शक्ती केंद्रांची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करू. सूर्यनमस्कार स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्य याची पूजा आहे. यामध्ये शरीरातील ९५% ते ९७% स्नायू कार्यरत होतात. सर्व स्नायुंची कार्यशक्ती पूर्णपणे १००% सुरु होते. याचा अर्थ काय ? हे कसे होते? त्याची प्रक्रिया काय ? याची माहिती आपण थोडक्यात करून घेतली. त्यातून हे स्पष्ट लक्षात आले की हे सर्व आपोआप घडत नाही. नुसतेच नभोवंदन करून किंवा सूर्यमंत्राचा जप करून, सूर्यप्रतिमेची पूजा करून हे सर्व फायदे मिळणार नाहीत. त्यासाठी कायिक व मानसिक साधना योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत. सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनातील ऊर्जाचक्र चैतन्याने प्रभावित करणे हा आपला प्रमुख उद्देश आहे. हा उद्देश कसा साध्य करता येईल याचा विचार करू. आज्ञाचक्र स्थान निश्चिती व महत्त्व तक्ता क्रमांक एकोणतीस सूर्यनमस्कार एक साधना - ३४