पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 श्रुतिविभिन्नाः स्मृतयश्च भिन्ना ।
 नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणं
 धर्मस्य आज्ञा निहितं गुहायाम्
 महाजनो यस्य गतः स पंथः ।।
 (वेदवचने भिन्न भिन्न आहेत,स्मृती वेगवेगळी मते मांडतात,दर्शने भिन्न आहेत.कुणाही एका मुनीचे वचन प्रमाण मानता येत नाही.धर्माची आज्ञा काय,धर्माचरण म्हणजे काय हे गूढ असते.तेव्हा धर्माचरण करताना समाजातले जे महाजन आहेत,ते ज्याप्रमाणे जातात,वागतात,वर्तन करतात,आचरण करतात त्याप्रमाणे वागावे म्हणजे धर्माचरण घडते)
 ९.१० आधुनिक कायद्यांचा अर्थ लावताना कायद्याच्या शब्दांपेक्षा वेगवेगळ्या न्यायाधिशांनी वेळोवेळी त्याचे लावलेले अर्थ (प्रिसिडंट्स) समाजधरीणांनी पाडलेले शिष्टाचाराचे संकेत (कन्वेन्शन्स) हे जास्त महत्त्वाचे असतात.राजाला अधिकार असत,पण त्याचा वापर त्याने धर्माच्या मर्यादेत.केला पाहिजे हा संकेत होता.अनुशासन म्हणजे धर्माचे अनुशासन असा अर्थ होता.अनुशासनाची व्याख्या राजाने करायची नसते तर धर्माचारी महाजनांनी करायची असते.म्हणून कर्तव्ये महत्त्वाची,हक्क महत्त्वाचे नव्हेत.वरिष्ठांच्या कर्तव्यात कनिष्ठांचे हक्कसंरक्षण होते.कारण दोघांनाही धर्माच्या मर्यादेतच राहायचे आहे.चार पुरुषार्थांत धर्माचे आद्यस्थान मानले जाते.मोक्ष हे सर्वात शेवटचे ईप्सित आहे.धर्म व मोक्ष या जीवनाच्या नदीच्या दोन तटांच्या आत अर्थ व काम या अन्य दोन पुरुषार्थांचा प्रवाह चालला पाहिजे.भारतीय विचाराची ही धारणा आहे.हे तट जेवढे घट्ट,त्यांच्यावर होणारे अर्थ व काम यांचे आक्रमण जेवढे कमी तेवढी समाजाची धारणा जास्त मजबूत बनते.
 ९.११ अंकगणित शिकवताना अ च्या खिशात दहा रुपये होते त्यातले ब ने पाच हिसकावून घेतले तर किती शिल्लक राहतील असे उदाहरण देऊन चालणार नाही. कारण अशा प्रकारच्या उदाहरणांनी शिकवलेली वजाबाकी धर्माज्ञांची,मूळ मूल्यांची वजावट शिकवील.अंकगणितात मिश्रण, प्रमाण,गुणोत्तर शिकवताना भेसळ कशी करावी हे शिकवून चालणार नाही.धर्माची लवचीक पण दृढ, महाजनांच्या आचरणावर आधारलेली व्याख्या परिवर्तनशील व नित्यनूतन राहणारी ठेवणे हा भारतीय विचारपद्धतीचा कणा आहे.

 ९.१२ आपल्यापैकी प्रत्येक व्यवस्थापकाला महाजनपद मिळवायचे आहे.कारण व्यवस्थापकाचा मोठ्या मानवसमूहाशी संबंध येत असतो, तेव्हा त्यांची वागणूक ही लोकांना आदर्श ठरू शकते.

४८ सुरवंटाचे फुलपाखरू