पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गृहस्थी. वैष्णव असून नसल्यासारखे. योगी पण भोगी. परमेश्वराने त्यांना इतरांपेक्षा वेगळा जन्म दिलेला होता. ते ईश्वराच्या नृसिंहावताराची मानव प्रतिकृती होते. नृसिंहाप्रमाणे अशक्य वाटणाच्या परिस्थितींच्या संधिकाळात नि सीमारेषेवर अवतीर्ण झाले होते. कबीरांमध्ये हिंदुत्व नि मुसलमानत्व सामावलेलं होतं. ज्ञान, प्रेम, योग, भक्ती, सगुण, निर्गुण अशा सर्व रस्ते मिळणाच्या चौकाच्या मध्यभागी ते उभे ठाकले होते. ते दोन्हीकडे पाहू शकायचे. परस्पर विरुद्ध दिशांचेही दर्शन त्यांना होत राहायचे. ही कबीरांना मिळालेली ईश्वरप्रदत्त देणगीच होती म्हणायची. कबीरदासांनी या प्राप्त परिस्थितीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

 कबीरदासांनी प्रेममूलक भक्तिसाधनेचा प्रारंभच केला मुळी एकदम दुसच्या किना-यावरून. हा किनारा सगुण भक्तीच्या अगदी विरुद्ध दिशेचा होता. सगुणांनी सर्वच ग्राह्य मानलं, उलटपक्षी कबीरांनी मात्र सर्व नाकारलं. त्यांच्यात दिसणारी प्रथम श्रेणीच्या भक्ताची प्रतिभा त्यांनी अथक परिश्रम व सार्थक धैर्यातून निर्माण केली होती. कबीरांचे मोठेपण त्यांच्या अतुलनीय साहसात सामावलेले दिसून येते. त्यांनी एकदम कोच्या पाटीवर लिहायला सुरू केलं. केवळ ज्ञानवाही पांडित्य त्यांच्या लेखी हमाली होती. अशामुळे मनुष्य जडबुद्धी होतो असे त्यांना वाटायचे. अडीच अक्षरी प्रेमशब्द त्यांच्या लेखी भक्ती सर्वस्व होतं-

पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय।
ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होई।।

 प्रेम हे सर्वस्व वेद, शास्त्र, कुराण, जप, माळ, चित्र, मूर्ती, मंदिर, मशीद, अवतार, नबी, पीर, पैगंबर सर्व त्यांच्या लेखी झूठ होते, व्यर्थ होते. त्यांच्या दृष्टीने प्रेम हे सर्व कर्मकांड, प्रतिमांपेक्षा श्रेष्ठ! सर्व कथित संस्कारांपेक्षा मनुष्यप्रेम श्रेष्ठ! त्याच्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट निषेधार्ह वर्ज्य!

 कबीरदासांनी सर्व प्रकारचे उपासतापास, तीर्थ, व्रतवैकल्ये इत्यादींना फाटा दिला. त्यांची क्रमवारी, प्रतवारी करत माणसामाणसांत भेद करण्याच्या खटाटोपास त्यांनी व्यर्थ परिश्रम समजून उपेक्षा केली. केवळ निर्गुण, निराकार परब्रह्माची भक्ती आपले ध्येय असल्याचे कबीरांनी स्पष्ट केले. भक्तीचे साधन म्हणून त्यांनी प्रेमास मान्यता दिली. त्याशिवाय कशासच त्यांनी मानलं नाही. प्रेम, भक्ती सर्वस्वी व्रत, शोक, पूजा, नमाज, हज, तीर्थ सर्व व्यर्थ मानत-

कहै कबीर भरम सब भागा, एक निरंजन -हूँ मन लागा।
साहित्य आणि संस्कृती/१८१