पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतीय संस्कृती : प्रश्न व योगदान


आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी : जीवन व साहित्य

 हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रांतात मोठी आचार्य परंपरा दिसून येते. आचार्य महावीरप्रसाद द्विवेदी, आचार्य रामचंद्र शुक्ल, आचार्य नंददुलारे वाजपेयी इ. नावे म्हणजे हिंदी विचारधारा नि समीक्षेची ओळख. या परंपरेतले ‘शेवटचे आचार्य' म्हणजे हजारीप्रसाद द्विवेदी. नंतर हिंदीत ‘डॉक्टर परंपरा दिसून येते. त्यातले अलीकडचे मोठे नाव म्हणजे डॉ. नामवर सिंह. ह्या दोघांनी मिळून दोन विचारधारा हिंदीत समृद्ध केल्या. पैकी पौर्वात्य विचारधारेचे मेरूमणी म्हणजे आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी तर पाश्चात्त्य परंपरेचे खंदे समर्थक डॉ. नामवर सिंह. आचार्य हजारीप्रसाद द्विवेदींनी बनारस हिंदू विद्यापीठ सांभाळले तर डॉ. नामवर सिंह यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली. दोघांना संस्कृत, इंग्रजीची चांगली जाण. त्यांचा हिंदी हा अभ्यास विषय असला तरी दोघांनी मिळून ‘पृथ्वीराज रासो' सारख्या महाकाव्याचे केलेले संपादन म्हणजे पूर्व पश्चिमेपलीकडे मानवतावाद हाच खरा विचारवाद असल्याचा पुरावा.

 आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी (१९०७-१९७९) हे हिंदी भाषा व साहित्य प्रांतातील समीक्षक, निबंधकार, कादंबरीकार, भाषांतरकार, संपादक म्हणून प्रसिद्ध होते. हिंदीशिवाय संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, बांगला या भाषांची त्यांना चांगली जाण होती. इंग्रजीचे त्यांचे वाचन व्यासंगी हाते. घरी ज्योतिष परंपरा लाभलेने हजारीप्रसाद द्विवेदी बनारस हिंदू विद्यापीठातून ज्योतिषाचार्य आणि इंटर उत्तीर्ण होऊन सन १९३० मध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमध्ये हिंदी शिक्षक म्हणून दाखल झाले. सन १९४० ते १९५० या काळात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्य केले. इथे त्यांना रवींद्रनाथांच्या बरोबर क्षितिजमोहन सेन, विधु शेखर भट्टाचार्य, बनारसीदास चतुर्वेदी प्रभृतींचा

साहित्य आणि संस्कृती/१०१