पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

冰涼涼冰冰涼涼號冰 १४ प्रस्तावना त्यांतून हौशीसाठीं मद्यसेवन करूनही ' प्रकृतिस्वास्थ्यासाठी हा मद्य घेतो,' असा डॉक्टरचा दाखला आणला की, समाजाच्या तोंडाला टाळेंच बसलें ! एवंच, खोट्याचा बंदोबस्त करण्यासाठीही वेडगळपणानें स्खलन पावणान्या भाबड्यांना दंड करण्याचा निग्रहीपणा कधीकधी समाजास स्वीकारावा लागतो. असो. मुख्य पात्र म्हणजे विठ्ठलपंत अंतर्धान पावल्यावर पैठणकरांनी निवृत्तिनाथादि भावंडांस ब्रह्मचर्याच्या अटीवर पंक्तिपावन करून घेतलें; व त्या भावंडांनी समाजहितैकदृष्टीनें ती अट तंतोतंत पाळली, ही गोष्ट उभयपक्षी भूषणावद्दच झाली. " कै. वि. ल. भावे हे या चार भावंडांना शालिवाहन शक १२०९ मध्ये मिळालेले पैठणकर ब्राह्मणांचे शुद्धिपत्र मान्य करतात, तें असो, पण ' या भावंडांनी नाथपंथ को स्वीकारला ?' या प्रश्नाचा विचार करतांना त्यांनी बांधलेले सिद्धांत व केलेली विधाने बरीच आक्षेपार्ह आहेत, असें दिसतें. ते म्हणतात, श्रीपादस्वामींसारख्यांचा अनुग्रह त्यांच्या पित्याला असतांना, ती सर्वमान्य परंपरा सोडून कानफाटे किंवा नाथपंथी यांचा अनुग्रह या भावंडांनीं को घेतला, त्या पंथांत हीं भावंडे कां शिरलीं असावीं, हा प्रश्न अनेक वेळां आपल्या मनापुढे उभी रहातो.” याप्रमाणें प्रश्न मनापुढे उभा करून, कै. भावे त्याचें उत्तर देतात. कीं, " निवृत्तिज्ञानेश्वरांच्या पूर्वी दोन पिढ्यांपर्यंत या पुरुषांचा नाथसंप्रदायांतील पुरुषांशी चांगला स्नेहसंबंध होता. या परिचयामुळे... तो पंथ या भावंडांना सुगम व अनुसरणीय वाटला... शिवाय नाथपंथांत चातुर्वर्ण्याची आडकाठी नसल्यामुळे इतर ठिकाणी येणारा अडथळा आयताच दूर झालेला होता. शिवाय प्रायश्चित्तादिकांनी फार तर निवृत्ति, ज्ञानदेव, व सोपानदेव यांची इतर ठिकाणी सोय लावून घेतां आली असती, पण त्यांची बहीण मुक्ताबाई हिची तर इतरत्र मुळींच सोय होण्याचा संभव नव्हता................तेव्हां ज्यांत आपल्याबरोबर हिलाही घेतां येईल व हिच्या देहाचे सार्थक साधेल असा हा नाथपंथच स्वीकारणें त्यांना अवश्य झालें. नाथपंथांतही स्त्रियांची सोय होण्यासारखी होतीच. " पण हें सर्व सांगून पुढे पृ. १४२ वर ते असेंही विधान करतात, की, "जैन, महानुभाव, वगैरेंनी चातुर्वर्ण्यव्यवस्थेला जो धक्का देण्याचा यत्न केला होता, व तत्कालीन हिंदुसमाजांत एका तऱ्हेची असंतुष्टता शिरून जो एक विस्कळितपणा येऊं पहात होता, तो नाहींसा करून चातुर्वर्ण्याचा भेदभाव मानवदेहाचें अंतिम साध्य जे मोक्षसाधन तें साधयति ......लवमात्र आड येत नाहीं, हें सांगण्यांत ज्ञानेश्वराच्या मोठेपणाचें बीज आहे. " या सर्व विधानांचा नीट आढावा घेतला, म्हणजे रा. भाव्यांची विचारपरंपरा भक्कम पायावर उभारलेली नाहीं, असें सहज ध्यानी येते. ज्ञानदेव व त्यांची भावंडे चातुवर्ण्यहीन नाथपंथांत गेलीं तीं आपल्या सोईकरितां असें कल्पावयाचें, आणि अशा नाथपंथांत गेल्यावरही ज्ञानदेवांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार मोठ्या जोरांत केला व तेंच त्यांच्या मोठेपणाचें बीज आहे, असेही मानावयाचें, यांत उघड उघड असंबद्धता आहे. आधी ज्ञानदेवांचा नाथपंथ आणि कानफाट्यांचा नाथपंथ, हे दोन्ही एकच आहेत, ही समजूत चुकीची आहे. नाथपंथाला चातुर्वर्ण्याचे वावडें नाहीं. ज्ञानदेवांप्रमाणे मुकुंदराज कवीही नाथपंथीच होते; पण ते चातुर्वर्ण्याच्या कक्षेबाहेर झटकले नव्हते. ज्ञानदेवांचे पणजे त्र्यंबकपंत यांनी गोरक्षनाथांचा अनुग्रह घेतला होता, तरी ते चातुर्वर्ण्यातच नांदत होते. निवृत्तिनाथांना शुद्धिपत्र मिळण्यापूर्वीच गहिनीनाथांनी नाथसंप्रदायांत प्रविष्ट केलें होतें, आणि असे असूनही पैठणकरांनी त्यांना व त्यांच्या भावंडांना शके १२०९ मध्ये शुद्ध करून ब्राह्मणसमाजांत घेतलें, असें कै. भावेच सांगतात. मग ज्ञानदेवादि भावंडांनी निवृत्तिनार्थापासून नाथपंथाचा उपदेश घेतला, तो मात्र त्या पंथांत चातुर्वर्ण्याची आडकाठी नसल्यामुळे घेतला, असे कसे म्हणतां येईल ? पैठणकर ब्राह्मणांनी या मुक्ताबाईसकट सर्व भावंडांना, ब्रह्मचर्य पाळावें व वंशवृद्धीच्या फंदात पडूं नये, या अटीवरच शुद्ध करून घेतले होते; तेव्हां मुक्ताबाईची व्यवस्था काय करावी हा तिच्या भावांना मोठासा पेंच नव्हता. ब्रह्मवृंदाच्या संमतीनेच ती ब्राह्मणजातीत आजन्म ब्रह्मचारिणी राहिली. ज्ञानदेवांनी आपल्या प्रस्तुतच्या भगवद्गीतेवरील भावार्थदीपिकेत (ज्ञानदेवांत) आश्रमचतुष्टय, चातुर्वर्ण्य, व ब्राह्मण, यांसंबंध ठिकठिकाणी आदरपूर्ण प्रशंसोद्गार काढले आहेत, आणि याच ग्रंथांत त्यांनी आपली आदिनाथापासून गुरुपरंपरा दिली आहे. तेव्हां ' नाथपंथांत चातुर्वर्ण्य नाहीं, ' हें विधान प्रत्यक्ष ज्ञानदेवानींच निर्मूळ ठरविलें, असें ओघानेच फलित होते. ज्या नाथपंथांत ही भावंडे सामील झाली होती, तो खरोखरी वैष्णवपंथच होय. या पंथाचे दैवत महाविष्णु व आद्यप्रवर्तक श्रीशंकर. योगाभ्यास में या पंथाचें एक विशिष्ट लक्षण ज्ञानदेवांनी सांगितलें आहे, आणि त्यांच्या ज्ञानदेवीच्या प्रवचनाला श्रोतृवर्गात बरीच नाथपंथी १ महाराष्ट्रसारस्वत, आवृत्ति ३ री, भाग १ ला, पृ. ११९. २ कित्ता, पृ० १२८. ३ कित्ता, पृ० १२९-१३० 涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼