पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नातेसंबंधांचे प्रेक्षकीकरण

 कधीकाळी जिवाला जीव देणारी माणसं आज आत्मरततेच्या शापानी एकमेकांचे वैरी होताना आपण पाहत आहोत. औद्योगिकीकरणाच्या घोडदौडीत रोज होणारे अपघात माणसाच्या काळजाचे ठोके चुकवेनासे झालेत. मृत्यूनंतर बारा दिवस शोक पाळणारा माणूस तिस-या दिवशी मृतशोक मागे टाकून जगण्याच्या उंदीरशर्यतीत स्वत:ला झोकून देतो आहे. घरातील वृद्ध नातेवाईक अडगळ वाटणे यासारखे अन्य जिवंत क्रौर्य तुम्हास अन्यत्र आढळणार नाही. भाऊबंदकी केवळ गडक-यांच्या नाटकाचा विषय न राहता ती जगण्याच्या चौकात रोज एकमेकांस भिडते आहे. बहीण रक्षाबंधन व भाऊबीजेची ‘गेस्ट' होऊन राहिली आहे. आई-वडील स्थावर जंगम संपत्तीचे हक्काचे हस्तांतरक झाले आहेत. सुनेला तिच्या आगमनाच्या वेळी स्त्रीधन म्हणून लोकलाजेस्तव स्वत:चे दागिने बहाल करणारी सासू सुनेच्या विश्वासाला हरताळ फासत स्वत:च्याच घरी चोरी करताना निढवत आहे. सून एकाच किचन कट्टयावर जेवण रांधवते; पण वाटीभर भाजी सासूस देण्याचे औदार्य दाखवित नाही. शेजारधर्म कर्तव्य न राहता उपचार बनून गेला आहे.
 असं का व्हावं नातेसंबंधांचं? असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा लक्षात येते की, हा केवळ जागतिकीकरणाचा शाप राहिलेला नसून ती माणसाची जीवनशैली बनते आहे. याला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे माणसाची भौतिनेक संपन्नतेची तहान त्याला उसंत देत नाही. तंत्रज्ञानानी माणसाच्या हातात जी विविध यंत्रे, उपकरणे दिली; त्यामुळे तो कधी काळी संवादात आत्मीयता अनुभवायचा. आज तो संदेशापासून रिकामा होतो. दूरदर्शन संच, वाहिन्या त्याला रोज मनोरंजनाचा नवा मेनू दाखवितात. त्यातील आभासी कथांमध्ये तो स्वत:चा विरंगुळा शोधत हरवत आहे. कधीकाळी पुत्रप्राप्तीशिवाय मोक्ष नाही म्हणणारा पिता जिवंतपणी मुक्तीचा अनुभव नार्सिसस होण्याच्या जीवघेण्या जगण्यात घेत रोज दारूच्या प्रत्येक

सामाजिक विकासवेध/१५४