पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मैत्रीला जात, धर्माच्या दुराव्याचा नि दुष्टाव्याचा स्पर्श नव्हता. मैत्री उभी होती माणूसपणावर. माणूसपण घरी, दारी सर्वत्र होतं. एकाच गल्लीत सर्व जाती, धर्माची कुटुंबं राहत होती. बेटीव्यवहार नसला तरी रोटीव्यवहार नक्की होता. व्यवहारात पैसा महत्त्वाचा नव्हता. संभाजीने केस कापायला पैसे घेतल्याचे आठवत नाही. उलटपक्षी मी दिलेच नाही म्हणा. संभाजीला पैसे देणं त्याचा अपमान करणं वाटावं इतकी जिगरी दोस्ती. मोठेपणी मी त्याला पुस्तके देत उतराई करीत राहिलो.

 ज्याला घर म्हणता येईल असं रूढ घर, कुटुंब, नातेवाईक मला लाभले नाहीत. पंढरपूरच्या आमच्या अनाथाश्रमात अर्भकापासून ते वृद्धांपर्यंत ३००-३५0 मुलं, मुली, महिला होत्या. हा आश्रम एक घरच होता; पण त्या घरात असलेल्या खोल्या-खोल्यांत छोटी कुटुंबं आकारली होती. आश्रमात स्थिर झालेल्या परित्यक्ता असत. त्यांना राहायला खोल्या होत्या; पण त्या मोठ्या खोल्यांची स्थिती धर्मशाळेसारखी असायची. एका खोलीत २०, ३० ,५0 स्त्रीया असायच्या; पण नोकरी करणाच्या स्त्रियांना स्वतंत्र खोल्या होत्या. त्या स्त्रिया आश्रमातीलच. त्यांना अन्न, वस्त्र, कपडा, बिछाना, तेल, साबण सारं आश्रम पुरवायचा; पण काम करतात म्हणून वर पगार भेटायचा. पगार ही मोठी देणगी होती. पगार दोन ते वीस रुपयांपर्यंत असायचा. या नोकरदार परित्यक्ता सांभाळ, शुश्रूषा, शिक्षण, शिवणकाम अशी वेगवेगळी कामे करायच्या. त्या आयुष्यभर आश्रमातच राहणार असायच्या. अनेक कारणांनी परित्यक्ता या आपल्या घर, परिवाराला कायमच्या पारख्या, परागंदा झालेल्या असायच्या. मग त्या आपलं एक कुटुंब तयार करायच्या. ती त्यांची भावनिक गरज असायची. हे त्यांचं आपल्या हरवलेल्या कुटुंबाचं उदात्तीकरण, उन्नयनीकरण (Sublimation) असायचं. रमाबाई व उमाबाई दोन नर्स होत्या. अशिक्षित असून शहाणपण असल्यानं त्या लिहायला, वाचायला शिकल्या. ताप पाहणे, ड्रेसिंग करणे, डिलिव्हरी करणे शिकल्या नि दाईच्या नर्स झाल्या. रमाबाईंना दोन पोटची मुलं, मुली. उमाबाईंना एकच मुलगी; पण पोलिओग्रस्त. दोघींनी मिळून आपल्या खोलीत स्वत:च्या विकास, स्नेहा, ज्योत्स्ना या तीन मुलामुलींशिवाय सुनील, अभय, रतन, अशोक, करुणा, शालिनी, कुसुम, रुक्मिणी, बेबी, चंचला, येसू, लीला सान्यांचा सांभाळ केला. त्या आमच्या आई, मावशी, बाबा नि काकांपेक्षा पुरुषार्थी होत्या. सतरा जणांचं कुटुंब पोसायच्या. इतक्या सा-यांचं रोजचं सारं म्हणजे जेवण, कपडे धुणं, भांडी घासणं, बिछाने, अभ्यास, चहा-पाणी, पुढे लग्न, बाळंतपण, नातवंडांचा

सामाजिक विकासवेध/१३५