१२. त्यांचे गायनानें संतोषित होतात, पण ती आनंद दायक विधा आ पणास किंवा आपले मुलाबाळांस यात्री असी इच्छा करीत नाहीत. या चे कारण त्या विद्येनें मनुष्यें विवडतात अशी लोकांची समजूत आहे. यातां लोकांना असे वाटण्याचे कारण इतकेच की, या गायनादि विद्येत माहितगार लोक बहुधा दुर्व्यसनी असतात असी समजत आहे, आणि दुसरे कारण असे की या विद्येचा नाद वेश्यांस फार असतो ह्मणून त्या विद्यचे मर्म जाणणारे पुरुषांस त्या विशेष मोशंत घालतात. बेश्यांना तरी या विद्येचा अंगीकार करण्याचे कारण इतकेंच आहे की, त्यांचा धंदा झडला झणजे केवळ दुसन्याचें मनरंजन करणे हा होय. तेव्हां त्या धंद्याला प्रकृत गुण हा उपयोगी असल्यामुळे त्या तो शिकतात. लोकांचें या विधे विषयों दुर्लक्ष होण्याचे कारण हेच आहे दर्ध्यसनी लोकांत ही विद्या दृष्टीस पडते यांत या विवेचा दोष कोणता? तशांतूनही विद्या केषळ निर्दोषी आणि शुद्ध असल्यामुळे तिजपासून दुर्व्यसन लागेल अशी कल्पना देखील नुकीचे आहे करणे कारण, यास वेदाची उपमा देणारे व गायनविद्येच्या संगतीने वेदांतील ऋचा ह्मणणारे कवी यांचें वर्तन कोणत्या प्रकारचें होतें हैं मनांत आणले झणजे या विद्येची योग्यता लक्षांत येते. पण हे मनांत न आणतां तिची उत्पत्ती यत्रनादिकां पासून कल्पून आपला वेडेपणा व्यक्त करणे, आणि त्यामुळे या सहिद्येपासून होणाऱ्या अनेक लामांस मुकणे हे सुज्ञ मनु प्यास योग्य नाही. याचा विचार सर्वांनी करावा.