पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. जितुकें कांहीं आपणास ठावें । तितुकें हळुहळू शिकवावें । शाहणे करून सोडावे । बहुत जन ॥ परोपरी शिकविणें । अडणुकां सांगत जाणें । निवळ करून सोडणें । निस्पृहासी ।। होईल तें आपण करावे । न होतां जना करवावें । भगवद्भजनेंविण राहावें । हा धर्म नव्हे ॥ आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें । आपण धरावें धरवावें । भजन मार्गासी ॥ विसावा दशक सर्व पारमार्थिक विवेचनाचा आहे व त्यांत थोडक्यांत वेदांततत्त्वाचें सार सांगितले आहे. पहिल्या समासांत प्राण, मन, पृथ्वी, आप, तेज, वायु आकाश इत्यादि तवें व परब्रह्म हीं सर्व व्यापक आहेत तर ती एक आहेत की काय असा प्रश्न करून त्याचें समाधान केले आहे. परब्रह्माखेरीज बाकीचीं तत्त्वें खरीं व्यापक नव्हेत; कारण तीं एकदेशी आहेत; परब्रह्म व पर्वत या दोहों स अचळ म्हणतात म्हणून ते एक होणार नाहींत; तर खरें व्यापकत्व व अचळत्व परब्रह्माचे ठायींच आहे असें विवेचन केले आहे. दुसऱ्या समासांत परब्रह्माच्या स्वरूपाचेंच निरूपण पुढे चालविले आहे. दृश्य आणि परब्रह्म यांचा विरोध खालील ओव्यांत दाखविला आहे. अधोर्ध्व पाहतां चहूंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे । मन धांवेल कोणीकडे । अंत पाहावया ॥ दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना । दृश्य आकळे ब्रह्म आकळेना | कल्पनेसी ॥ अशा ब्रह्मापासून मूळ माया झाली; तिच्यापासून अष्टधाप्रकृति माया झाली व त्यापासून सर्व दृश्य जग झालें असें या समासांत सांगितलें आहे. तिसऱ्या समासांत मायेपासून पृथ्वी व पृथ्वीपासून सर्व चराचर प्राणि कसे झाले याचें निरूपण करून साधूला खरें ज्ञान प्रत्ययानें होतें व प्रपं चांत काय किंवा परमार्थात काय प्रचीति वांचून बडबड व्यर्थ आहे असें म्हटले आहे.