Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. १ जी नेमणूक केली होती ती सारखी चालू होती व चाफळच्या मठाची व्यवस्था असूनही भिक्षेवरच चालू होती; हें या केशव गोसाव्याच्या पत्रा- वरून दिसतें, या पत्रांतील मजकुराचा विचार केला व मार्गे दिलेल्या पत्रांचा विचार केला तर शिवाजीची प्रथम भेट याच सालांत झाली याबद्दल मनाची बालंबाल खात्री होते. पण रा. देव व रा. राजवाडे या पत्रांतही भास्कर गोसाव्याच्या पत्राप्रमाणे क्लिष्ट कल्पना व व्यंग्यार्थ काढ- तात. राजवाड्यांच्या मतें प्रथम भेट याच्या आधीं ‘या मुलाखतीतील 'असे शब्द गृहीत धरावे म्हणजे झालें ! मग या पत्राचा असा अर्थ होतो कीं, महाराजांच्या व समर्थांच्या पूर्वी किती तरी मुलाखती झाल्या होत्या व अशा एका मुलाखतींतील ही प्रथम भेट होय. रा. राजवाडे यांची ही कल्पना वाचून या लेखकास पुनर्विवाहाच्या वेळच्या वादाची आठवण झाली. त्या वादाचे वेळीं' 'नटेमृते' या प्रसिद्ध श्लोकाचा पुनर्विवाहपर अर्थ खोडण्याकरितां ' पतीच्या ' ठिकाण 'अपति' असें रूप धरावें म्हणजे झाले अशी क्लिट कल्पना जुन्याच्या अभिमान्यांनी काढली होती त्या- सारखीच रा. राजवाडे यांचीहि कल्पना आहे. त्या वादाची त्यांना माहिती नसल्यामुळे त्या वेळची सोपी युक्ति त्यांना सुचली नसावी व झणून या मुलाखतीतील ' इतकें लांबलचक पद गृहीत धरण्याची कल्पना त्यांना काढावी लागली ! नाहींतर इतके जास्त शब्द घालण्या ऐवज ' समर्थांचे' पाठीमागें 'अ' असें अक्षर आहे व ह्मणून हें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीबद्दल मुळींच नाहीं; व अर्थात् या पत्रावरून भेटीचा काल मुळींच शाबीत होत नाहीं असें त्यांना ह्मणतां आलें असतें ! मन एकदां पूर्वग्रहदूषित झाले म्हणजे तें अर्थ लावण्यांत काय काय मौज करूं शकतें याचा या पत्राचा वरील प्रकारचा व्यंग्यार्थ हा उत्तम मासला आहे. 6 पण पूर्वग्रहविरहित माणसास हें केशव गोसाव्याचें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या कालाचा प्रत्यक्ष पुरावा आहे हे उघड आहे. तेव्हां आतां हातच्या कांकणाला आरसा कशाला ! पण रा. चांदोरकरांच्या कागदपत्रांत असलीं आरसेवजाही पत्रे आहेत; त्यावरून या प्रश्नावर काय-