१५९ शिवा-बावनी जव्ही आपण रागावून (वीरोचित) अभिमानाने तरवार उपसतो, तेव्हा काबूल कंदाहार डळमळून जातात. (३९) | ‘सिवा की बड़ाई और हमारी लघुताई क्यों कहत बार बार' कहि पातसाह गरजा । सुनिये ‘खुमान हरि तुरुक गुमान महि देवन जेवायो' कवि भूषण यो अरजा ॥ तुमवाको पाय कै जरूर रन छोरो वह रावरे वजीर छोरि देत करि परजा । मालुम तिहारो होत याहि मैं निबेरो रन कायर सो कायर औ सरजा सो सरजा ॥ ४० ॥ 1. औरंगजेबाने एकदा भूषण कवीस खोखोदून विचारले की, तू नेहमी शिवाजीची प्रशंसा आणि आमची निंदा कारतोस ह्याचे फाय कारण ? भूषणाने विनयपूर्वक उत्तर दिले–‘ऐका, तो शिवाजी चिरंजीव होवो, त्याने म्लेंच्छचा गर्वहरण करून देवाब्राह्मणांचे संरक्षण केले. दुसरे असे की, रणति तुम्ही त्याला पाहिले मात्र कीं, तुम्हस रण सोडून पळून जावें लागते. (शिवाजी ही संधि पाहून) तुमच्या प्रधानास आपली प्रजा करून घेतो, (आपल्या छत्राखाली घेतो). तुमच्या प्रश्नाचा निवाडा या तुमच्या कृतीतच आहे. तुम्ही रण सोडून पळून जातो आणि शिवाजीस पाहून भित म्हणून तुम्ही रणभीरु व तो रणशूर सिंह. (४०) कोट गढ़ ढाहियतु एकै पातसाहन के, एकै पातसाहन के देस दाहियतु है। भूषन भनत महाराज सिवराज एकै साहन की फौज पर खग्ग बाहियतु है । क्यों न होहि बैरिन की बौरी सुनि बैर बधू दौरान तिहारे कही क्यों निवाहियत है । रावर नगारे सुने बैरबारे नगरन नैनबारे नदन निवारे चाहियतु है ॥ ४१ ॥ हे शिवाजी महाराज ! आपण कोणा बादशहाचे किल्ले पाडतो, कोणाचे देश जाळून भस्म करित, तर कोणा बादशहाच्या सैन्यावर तरवार चालवित हा आपला पराक्रम पाहून शत्रुखिया कई बाँवरणार ( बावचळणार ) नाहीत ? तमच्या हल्ल्यांपासून त्या आपले संरक्षण कसे करू शकतील?
पान:संपूर्ण भूषण.djvu/209
Appearance