Jump to content

पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- तरी अशा रीतीनें त्यानी मल्हारराव महाराज यांस उघडपणे कळवून एखाद्या च्या मनांत भलतेच विचार येण्यास सवड सांपडते असे करावयाचे नव्हते. दुष्ट मनुष्या- आम्ही एक टिपेत वाक्य लिहिले आहे त्याचा अर्थ असा आहे की, वाईट राजाला मारून टाकण्याविषय परवानगी देणें हें फार राक्षसी आणि अविवेकी मत आहे. जर महाराज आपल्या प्रजेस खरोखर नकोसे झाले असते तर त्यांची काय बरें दशा झाली असती ? परंतु तसा प्रकार मु- ळीच नव्हता हे महाराजांस मद्रासेस पाठविल्यावर त्यांच्या राजधानीतील लोकांनी त्यांच्या मागे त्यांच्या मुलास गादीवर बसवून त्याच्या नांवें राज्य चालविण्याविषयीं जो प्रयत्न केला त्यावरून ★ व दामोदरपंत नेने यानी महाराजाविषयीं साक्ष दिली त्याबद्दल त्यांचा सूड उगविण्यासाठी त्याच्या घराकडे धांव घेऊन त्याचें घर लुटलें, यावरून त्यांच्या राजाविषयीं त्यांची भक्ति किती दृढ होती है स्पष्ट समजतें. नगरवासी लोकांच्या धाडसाविषय सूक्ष्म विचार केला म्हणजे आपल्या राजाविषय बडोद्याच्या प्रजेस अतिशय अनुराग आहे असे दिसते. इंग्रज सरकारच्या हातांत राज्याची सत्ता असतां व कांहीं दंगा फितूर होऊ नये यासाठी योग्य बंदोबस्त ठेविला असतां व गजानन बिठ्ठल आणि दुसरे पोलिसचे अधिकारी गुप्त- पणें संचार करीत असतां व भाऊ पुणेकर आदिकरून मल्हारराव महाराजांची विरोधी मंडळी खऱ्या खोट्या बातम्या कळवून आपले महत्व वाढविण्यासाठी तत्पर असतां एकाएकी अगोदर कांहीं संगनमत न करितां व राष्ट्रांतील शिष्ट लोकांची त्यानमध्ये अनुकुलता नसतां एकच उद्देश मनांत धरून हजारों लोक एकत्र जमले हैं खऱ्या राज्यभक्तीचें मोठे प्रमाण आहे. अगोदरपासून जर या लोकांमध्ये मसलत झाली असती तर ती छपली गेली नसती, आणि या बद्दलच्या चौकशीवरून देखील असे काहीं उघडकीस आले नाहीं को, हा विचार कांही दिवसांपासून घाटत होता.* तेव्हां ज्या दंग्यामध्यें शिष्ट लोकांचे आंग नाहीं, सरदार मानकरी लोक अनुकूल नाहींत, मल्हारराव यांचे आवडते लोक सामील नाहीत, त्याः दं- ग्याचा उद्भव राज्य लक्ष्मीच्या उपभोगाशी ज्यांचा संबंध फार थोडा अशा वाणीबकाल वगैरे लोकांपासून होणे हें कांहीं सामान्य राजभक्तीचे प्रमाण नाहीं. त्यांतही राजधानीतील लोकांनी असा दंगा करणें हेंही विशेष राजभक्तीचे चिन्ह आहे; कारण मल्हारराव महाराज यांच्या जुलमाचा संस्कार जितका शहरवासी लोकांवर झाला होता, व दुसऱ्यावर झालेला जुलूम त्यांनी पाहिला होता तो अनुभव कांहीं देशांतील लोकांस नव्हता असे असून जर त्यांची राज्यानेष्य तशीच होती तर त्यापेक्षां प्रजानुरागाचे आणखी ते कोणते उदाहरण पाहिजे. गायकवाड सरकारच्या प्रने दुःखांतून मुक्त करण्यासाठी आपण हयगय केली तर येऊन त्यांची आपल्यावरील राज्यमक्ति कमी होईल दे 'यांच्या मिनिटांत लिहिले आहे. त्या लोकांची आपल्या प्रजेस करुणा - अशा गर्भित अर्थाचें एक वाक्य टकर साइक

मल्हारराव महाराजांचे पक्षपाती म्हणून कांहीं लोक.. म संशयावरून बढौचाच्या हद्दीबाहेर काढून दिले आहेत व त्यांजविषयीं संशयनिवृत्ति झाली असता त्यास अद्याप वडोद्या.. ण्याची परवानगी मिळत नाहीं. जा-