Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारभारी पक्षाच्या हकीकती सुद्धां. दादासाहेब यांस रक्ताचा टिळा लावून गादीवर बसवावे. असे बोलून फडावर जाऊन मुत्सद्दी वगैरे यांची कचेरी केली. आणि चौघडे वगैरे वाद्ये सुरू जहाली. अशी खुषी वाडयांत मंडळीस जहाली. व सौ| आनंदीबाई यांणी साखरा वाड्यांत वांटिल्या. नंतर चार घटकांनी दिल्लीदरवाजा उघ डला. ते वेळेस कैलासवासी यांची स्त्री सौ गंगाबाईसाहेब प्रातःकाळी आपले माहेरी गेली होती. ती दरवाजा उघडतांच धावत आली. आणि नारायण राव साहेब पडले होते तेथे येऊन बसली. आणि सती जाण्याचा मनोदय- दिसून आला. तो इतकियांत भवानराव प्रतिनिधीही वाड्यांत आले. तो सरकारचे बरोबर प्रतिनिधी सहीत हजार माणसें नागव्या तरवारी करून फंडावर आले. आणि दादासाहेब यांस बोलले की, "तुम्ही पेशव्यांचे कुळीं जन्म घेऊन हें कर्म अघटित केलें. हे फार वाईट !" असे नाना प्रकारचें बोलून म्हणाले की " तुमचें तोंड पहावयाचें नाहीं." इतकें बोलून माघारी आले, नंतर त्रिंबकराव मामा हे वाड्यांत येऊन दादासाहेब यांस पुसलें कीं, णराव याचा मुर्दा आहे त्याचा विचार काय आपण धरिला ! व आपण जे केले ते चांगले केले ! " तेव्हां दादासाहेब यांणी सांगितले, " याचे दहन " नाराय- 66 करावें. " त्यावेळेस कोणी ब्राम्हण येईनीं. दहशतीमुळे भयाभीत जाले. तेव्हां दादासाहेब बोलिले की, “ कसेही करून याचें दहन करावे." मग मामा बाहेर येऊन पांच तेलंग बोलावून पांच रुपये हातावर ठेविले, वाड्यांत घेऊन आले. तो गंगाबाईचा निश्चय बरोबर जाण्याचा पाहून आनंदीबाई यांस बहुत संतोष जहाला. नंतर गंगाभागिरथी पार्वतीबाईसाहेब, भाऊसाहेब यांची बायको, यांजला विचार कळतांच गंगाबाईस बोलली की, " तुजला वेड लागले ! बहुत करून कुळक्षय गर्दीत जहाला तुझी पाळी चुकली आहे. ईश्वर करूं लागल्यास राईचा पर्वत करील. " अशा गोष्टी नाना प्रकारे करून सांगितल्या. परंतु मानीना. तेव्हां हाती धरून खोलीत घातली. आणि बाहेरून कडी लावली. आणि जवळ आपण बसली. मामांस सांगितले की, " मुर्दा कारण पार्वती काकूचाई हो न्यावा. या प्रमाणे काकूबाईंनी सांगितले. ७. रक्ताचाटिळा लावण्याची वहिवाट ज- | असतां त्यांस वाहून नेण्यास त्यांचे अन्न दपुरास आहे. असो. दाढ़ांस टिळा गार- खादलेल्या ब्राम्हणांतून वेळीं एकही उप- यांनों लाविला अर्से दुसऱ्या ग्रंथांत योगी पडूं नये या उपर आणखी लब्जेची आढळते. गोष्ट कोणती ? असो. पिठाचा नारायण- राव करूम त्याजबरोबर एक महत्वाचा कागद प्रथम जाळला, नंतर नारायणरावाचे शत्रु नदीवर नेलें, असें ऐकिवांत आहे त्यास येथें आधार नाहीं. • ८. साठे तपकीर गल्लोतील. ९. सरकारी काम चालण्याची जागा. सेक्रेटारिअट. १०. खांसे श्रीमंत अशा तऱ्हेने पडले