Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)
कारभारी पक्षाच्या हकीकती सुद्धां.

दिवशी रात्री नानांचे वाड्यांत अकरा जण मुत्सद्दी जमले होते. ते नांवनिशीवार:-

१ नानासाहेब फडणीस. १. त्रिंबकरावमामा. १ हरीपंत तात्या.
१ नारो आपाजी १ आपाजी बळवंत. १ आनंदराव पानसे.
१ बाबूराव केशव. १ कृष्णाजी बहिरव थत्ते. १ खासगीवाले.
१ विसाजी कृष्ण बिनीवाले. १ आपाजी पुरंदरे. ० लग.
--
--
--

११

 या प्रमाणे मुत्सद्दी जमा होऊन दादासाहेब धरावे असा निश्चय होऊन अकराजणांनी यादी लिहिल्या. मग त्रिंबकराव मामा यांनी सांगितले की, "पूर्वी सखाराम बापू यांचा रुकार प्रथम पाहिजे. आणि या खेरीज कोणी रुकार घालू नये."

मामा वगैरे मुत्सद्दी आपआपले वाड्यांत गेले. दुसरे दिवशी सर्व मुत्सद्दी नानांच्या वाड्यांत आले. तेव्हां नानासाहेब यांणी सर्वांस विचारिले की, "यांतून कोणी फुटला असतां दादासाहेब सर्वांचे पारिपत्य करील. त्या पेक्षां गीता गंगाजळी "व फुले तुळशी सर्वांनी एक मेकांस उचलून द्यावी" आणि सांगितले की, "कोट्यावधि रुपये खर्च जहाला तरि सर्वांस करावा लागेल. " ते सर्वांनी मान्य केले. व कोणी फुटला असतां पारपत्ये करून पायांत बिड्या घालाव्या असे ठरले. नंतर नानांनी सांगितले की, "सखाराम बापू या मनसब्यात पाहिजे. तर तुमची मसलत शेवटास जाईल. त्याचे आंग दादासाहेब यांजकडे आहे." मग मामांनी उत्तर केले की, तुमचा अकरा जणांचा खंबीरपणा जहाला. त्यापेक्षां बापूंचा जिम्मा मी करितो. असे उतर मामांचें ऐकून नानांनी उतर केले कीं, "तो सगळा शहाणा, त्याचा जिम्मा तुम्हांकडेस आल्यास माझा जिम्मा बापूपाशी द्यावा." पुन्हा मुत्सद्दी आपआपल्या वाड्यांत गेले.
 दुसरे दिवशीं मुत्सद्दी सखाराम बापू सरकार वाड्यांत आले. कारभार जाहला. बापूंचा व मामांचा बेबनाव होता. सरकारचे कामाविशी मात्र बोलावे [ते] कार्या कारण. फारच वांकडेपणा होता११[]. कचेरी बरखास्त जहाल्यावर रात्रौ भोजन मामांनी करून सखारामबापू यांचे वाड्यांत गेले. पहारेकरी [यांणीं] बापू दिवाणखान्यांत बसले होते तेथे जाऊन सांगितले की, "मामा खाली उभे राहिले आहेत." बापू बोलले कीं, "अशी गोष्ट कशी घडेल? पूर्वेचा सूर्य पश्च


  1. वाकडेपणा माधवरावानें बापूंस काढून मामांस कारभारी नेमिलें तेव्हांपासून पडला असावा. वांकडेपणा असण्याचें दुसरें कारण काय?