पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एकापरी ही वाटचाल अनुराधा व श्रीनाथ या उभयतांची असली तरी स्वः लेखिकेने परस्परांशी समरस होऊन अगदी ती तिची स्वतःची एकटीची अद्वैत वाट म्हणून जोपासली आहे. अशा वाटचालीत माहेरीची आणि सासरची माणसे, मित्र, मैत्रीणी, आपले कुटुंब, गुरू, आदर्श म्हणून समोर ठेवलेले हितचिंतक ही सारी ठिकाणी आपल्या वाटचालीचे वळण बदलणारे विश्रांतीचे ठिकाणे झालेली आहेत. ही जीवनाची वाटचाल भूतकाळातून वर्तमान काळाकडे येते व तितक्याच ओढीने भविष्यकाळ जागविते.
 लेखिकेने अचूक पण थोडया शब्दात आपला आशय स्पष्ट केला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर 'लग्नापूर्वीचे ते निर्णय बेकंनेच्या पाठयासारखे साधे, सोपे, सरळ वाटत. जीवन साथीने व्यवसायाच्या माध्यमातून घरासाठी पैसा मिळवावा असे कधीच वाटले नाही आणि आपल्याला मिळणारा पगार हा दोघांचा आहे हीच भावना दोघांच्याही मनात रूजलेली होती.' ही सूचक वाक्ये बरेच काही सांगून जातात आणि ज्यामुळे बरेच काही सांगायचे राहिले आहे. पण ते वाचकाच्या गळी उतरले आहे याची जाणीव करून देतात. अशा वेळी हे समग्र लेखन लेखिकेला आत्मचरित्रतील सलग कहाणीची आठवण करून देते. मात्र ते आत्ममग्न शैलीची कारागिरी दाखवित नाही. ही कहाणी अनू आणि श्री ची असली तरी त्यात अनेक ध्येयवेडी जोडपी प्रतिबिंबित झालेली दिसतील.
 लेखिकेने इ.स. १९७२ ते १९७५ चे मंतरलेले दिवस चितारताना तो ध्येयवादी काळ अगदी हुबेहुब चित्रित केला आहे. १९७४ चा दुष्काळ, विरोधी मोर्चा, हजारो स्त्री-पुरूष भाकऱ्या बांधून मोर्चात सामिल झालेले सत्याग्रही, पुढे १९७५ मध्ये आलेली आणीबाणी, त्यात श्रीला झालेली अटक, त्याची नाशिकच्या जेलमध्ये झालेली रवानगी, त्याला घरातून दिलेला निरोप, त्यावेळची समग्र कालवाकालव व पुढे तो पॅरोलवर सुटल्यानंतरचे त्याचे घरी स्वागत, पुन्हा जेलकडे प्रयाण हे सारे प्रसंग एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे लेखिका रंगविते. त्यातले सारे गहिरे रंग आपलेसे करण्यास वाचक रंगून जातो. मोर्चामध्ये ज्या कविता गाइल्या जातात, त्याचे ओघवते ध्रुपद आपल्या