पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जुने दिवस आठवीत श्रीनाथचा डोळा लागला होता.
 एल.एल.बी. च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन आल्यावर बाई काकाजींनी त्याच्या विवाहाचा विषय छेडला. त्यावेळी त्याने स्वच्छ शब्दांत सांगून टाकले.
 "काकाजी, मला लग्न करण्यात फारसा रस नाही. माझी वकिली अडल्यानडल्यांना न्याय मिळावा म्हणून असेल. मी इकडेच रहाणार आहे. सध्यातरी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाचे काम करायचे ठरवले आहे. माझ्या विचारांशी जिचे विचार जुळतात. जी माझी आर्थिक बाजूही थोडीफार सांभाळीत अशी मैत्रीण पत्नी म्हणून हवी आहे. अशी मुलगी मिळाली तर ठिक अन्यथा मी सडा फटींग राहीन...."
 कान्तूदा, मला जमीन नको. आपल्या जमिनी नेहमीच तहानलेल्या.. भेगाळलेल्या तिची तहान कशी भागेल याचाच विचार माझ्या मनात सतत असतो. तुम्हीही जमिनीत खूप राबता. मला जमेल ती मदत जरून करीन मी.
 … पण जमीन विकायला मात्र माझा विरोध राहील आणि हा विषय पुन्हा नका छेडू मनासारखी जोडीदार सापडली तर आपणहून तुम्हाला सांगीन.
 त्यानंतर घरात हा विषय निघाला नाही.

 अनू एम.ए. च्या शेवटच्या वर्षाला असताना वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. अनूच्या डोळ्यासमोर श्रीनाथहून वेगळी व्यक्ती जोडीदार म्हणून उभीच रहात नव्हती. अनूने आईजवळ मन मोकळे केले. अनूचे वडील नव्या वळणाचे. आर्थिक सुबत्तेत वाढलेली अनू या गावंढ्या परिसरात रमेल का, हा प्रश्न वडीलासमोर होता. लाडक्या अनूवर श्रीनाथ कोणतेच दडपण आणणार नाही ही एकच जमेची बाजू होती.
 अनूचा निर्धार पाहून डॉक्टर साहेबांनी लेकीच्या लग्नाला संमती दिली. १९६७ च्या उन्हाळ्यात काही मित्रमंडळी, सेवादल, समाजवादी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांच्या साक्षीने अनुराधा पाठक आणि श्रीनाथ धानोरकर हे विवाहबध्द झाले. मोठा श्रीकांत त्याची पत्नी विमला, बाईने दिलेले गंठन आणि साडी घेऊन लग्नाला आले होते.

 श्रीनाथने वकीलीचा मांड परळी सारख्या खेड्याचा चेहेरा असलेल्या गावात टाकला. परळी हे रेल्वेचे जंक्शन. इथून परभणी परळी मार्गे हैद्राबादला जाणारी ब्रॉडगेजवरून धावणारी मराठवाड्यातील एकमेव मोठी गाडी जाई. मनमाड-औरंगाबाद मार्गे परभणीहून निजामाबाद मार्गे हैद्राबादला जाणारी लहान गाडी असे. अर्थात ही


शोध अकराव्या दिशेचा / १९