पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्या काळात सर्व कला, विद्या, तंत्रज्ञान या पुस्तकि किंवा बिगरपुस्तकि ज्ञानाचे हस्तांतर पारंपरिक पद्धतीने वडील पिढीने नवीन पिढीला घरोघरी देणे या पद्धतीनेच होत होते. या ज्ञानाचा वापर सर्वांसाठी होणे यात सुलतानशाहीचा व वतनदारीचा राजकिय व आर्थिक अडसर मोठा होताच. त्यामुळे कला विज्ञान, व्यावसायिकांना त्यांचे धंदे सुरळीत सुरू करण्याच्या विरोधातले अडसर दूर होणे ही विकासाची मूलभूत पायरी व त्यानंतर कला विज्ञान तंत्रमानाचे विकसन, नवीन गोष्टी विकसित करणे परत त्यांचा सर्वसामान्यांसाठी वापर होणे ही दुसरी पायरी ठरावी.

 महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या राज्यात ही पहिली पायरी समाजाने ओलांडली हे निश्चित. त्या धकाधकिच्या काळात दुसऱ्या पायरीकडे जाण्याइतका वेळ, स्थिरस्थावरता स्वराज्याच्या धुरीणांना मिळाली नाही. पण या दुयऱ्या पायरीची बीजे पुरंदर किल्ल्यावरचा तोफाचा कारखाना, आरमारी व व्यापारी हालचालींसाठी लागणाऱ्या नौकांचे कारखाने इ. अनेक गोष्टीत दिसतात.


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ८०