पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बजवजपुरी माजली होती. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता.

 शहाजींचा स्वराज्याचा प्रयत्न

 १९२६ ते २७ या काळात निजामशाहीचा कर्तबगार वजीर मलिक अंबर, विजापूरचा इब्राहीम आदिलशहा आणि दिल्लीचा सम्राट बादशहा जहांगीर या तिघांचाही एकापाठोपाठ एक मृत्यू झाला. त्यानंतर जी राजकीय अंदाधुंदी माजली त्याचा फायदा घेऊन अनेक मराठे सरदार उदयाला आले आणि काही काळ तरी त्यांनी सुलतानांच्या दरबारातील सत्ता आपल्या हाती ठेवली. निजामशाहीत मलिक अंबराचा मुलगा फतेहखान आणि हमीदखान यांच्या लठ्ठालठ्ठीत लखुजी जाधवांचा खून पाडला गेला. विजापूरच्या दरबारातही मुस्तफा खान व खवासखान यांचे दोन तट पडले. दोन्ही शाह्या मोगलांच्या मदतीने एकमेकांस ग्रासण्याचा प्रयत्न करू लागल्या. या परिस्थितीचा फायदा घेऊन शहाजीराजांनी पुणे प्रांतात उठाव केला. त्याचा बंदोबस्त विजापूर दरबारने मुरारपंतांना पाठवून केला ही हकीकत पूर्वी आलेलीच आहे. मुरारपंताशी सल्लामसलत करून शहाजीने नंतर नाशिक, त्र्यंबकेश्वर, संगमनेर, जुन्नर व कोकणापर्यंत प्रदेश ताब्यात घेतला व निजामशाही वंशातील एक मूल गादीवर बसवून ते स्वत:च या राज्याचे कारभारी बनले. एका बाजूला मोगल आणि दुसऱ्या बाजूस आदिलशाही यांना एकमेकांत खेळवून १६३३ साली शहाजीने पेमगिरी येथे निजामशहास राज्याभिषेक करवला. आदिलशाहीतील परिस्थितीत उलथापालथ होताच 'महाराज राजाधिराज मुरारी पंडित साहेब' एकटे पडले, कैद झाले. त्यांची जीभ छाटून गाढवावरून धिंड काढली व त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. विजापूर व दिल्लीतील तहानुसार शहाजीच्या निजामशाहीस मान्यता नाकारण्यात आली व दोन्ही राज्यांच्या फौजा शहाजीविरुद्ध चालून आल्या. शहाजीला निजामशहा मोगलांच्या हाती द्यावा लागला आणि विजापूरची चाकरी पत्करावी लागली.

 मुसलमान अंमलाच्या पडत्या काळात शहाजीने काही हिंदू सरदार, तर दरबारातील रणदुल्लाखान, खवासखान यांसारखे काही मुसलमान सरदार एकत्र करून आपल्या अंमलाखाली एक राज्य तयार करण्याच्या प्रयत्न केला. रयतेला लुटणाऱ्या वतनदारांची आघाडी बांधून स्वत:चे राज्य उभे करण्याचा प्रयत्न शहाजीने केला. त्यात त्याला यश आले नाही. आले असते तरी नवीन राज्यात रयतेच्या दु:खात, हलाखीत काही फरक झाला नसता. मुसलमान सुलतानांची जागा हिंदू सुलतानांनी घेतले असती एवढेच. रयतेच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी, वतनदारी मोडून काढून मावळ्याची, रयतेची फौज तयार करून शेतकऱ्यांना नाडणाऱ्या मुसलमान दरबार व हिंदू वतनदार यांच्याशी एकाच वेळी टक्कर देऊन स्वराज्याची स्थापना करणे आवश्यक होते व हेच काम

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ३२