पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रड्डी, अरविंद गोविंद प्रशासन खंड रड्डी, अरविंद गोविंद भारतीय वन सेवा, प्रधान मुख्य वनसंरक्षक २७ डिसेंबर १९३७ अरविंद गोविंद रड्डी यांचा गुजरात मधील अमरेली या गावात झाला. त्यांचे वडील भारतीय प्रशासन सेवेत, सेंटलमेंट कमीशनर व कलेक्टर या पदावर कार्यरत होते. तर त्यांचे आजोबा कर्नाटक कॉलेज धारवाड येथे संस्कृत विषयाचे प्राध्यापक होते व पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रातीही त्यांचा जवळचा संपर्क होता. अरविंद रड्डी यांचं प्राथमिक शिक्षण द्वारकेला झालं. द्वारकेला अथांग समुद्र आहे. बालवयातच त्या समुद्राच्या हिंदकळणार्‍या लाटांनी मनात घर केलं आणि तेव्हापासूनचं मनात निसर्गाचं वेड निर्माण झालं. परंतू वडीलांच्या बदलीमुळे द्वारका सोडावी लागली आणि त्यानंतरचं शिक्षण पुण्यात दस्तुर हायस्कूलमध्ये त्यांनी ते एस.एस्सी. पर्यंतच शिक्षण त्यांनी घेतलं. त्यानंतर १९५३ साली त्यांनी बी.एस्सी.ला फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. निसर्गाचे प्रचंड वेड हेच होते. इथून बी. एस्सी. प्रथम क्रमांक एम.एस्सी. प्रथम क्रमांक. १९५९ साली वनसेवेची स्पर्धा परीक्षा त्यांनी दिली आणि भारतभरातून या परीक्षेत पास झालेले प्रशिक्षण पास झालेेले प्रशिक्षणाकरिता डेहराडून येेथे केले जातात. त्या ठिकाणी अरविंद रड्डींना भारतातील विविधतेचे आणि त्यातील एकात्मतेचं जवळून दर्शन झाले. प्रशिक्षणानंतर १९६२ साली अरविंद रड्डी यांची चंद्रपूरच्या वनविभागात सहाय्यक वन संरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी नेमणूक झाल्यानंतर योगायोगानेच त्यांच्या आनंद द्विगुणित करणारी घटना घडली. ती म्हणजे चंद्रपूरच्या त्या जंगल परिसरात ताडोबा अभयारण्याच्या झाली आणि अरविंद रड्डी यांनी त्यात मनापासून सहभाग घेतला आणि त्या अभयारण्यात काम केले. यादरम्यान त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली ती म्हणजे १९६८ साली त्यांना कॅनेडियन सरकारची कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.च्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. यासाठी त्यांचा विषय होता. वन्यप्राणिशास्त्र या प्रबंधासाठी त्यांनी हरणांवरती प्रबंध तयार केला. या दरम्यान त्यांनी रात्ररात्र जागरण करून हरणांवरती संशोधन केले. अशा प्रकारच्या अभ्यास करून सादर करणारे अरविंद रड्डी हे पहिलेच भारतीय अस शकतील. त्यांनी दृष्टिकोन व्यापक होणे या संशोधनांना १९६८ मध्ये पुन्हा त्यांची चंद्रपूर विभागीय वनाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या कालावधीत भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून चंद्रपूरचे अभयारण्य पाहण्यासाठी व जंगलात वास्तव्य करण्यासाठी अफगाणिस्तानचे पंतप्रधान नईम व त्यांच्यानंतर इराणचे शहेनशहा मुहम्मद रेझा पेहलबी हे आले होते. जंगलात कुठलाही धोका होऊ शकतो, त्यासाठी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक ठेवण्यापासून ते जंगलातील सर्व ठिकाणे व्यवस्थित दाखवण्यापर्यंतची मुख्य जबाबदारी सहकार्यासह रड्डी यांनी अतिशय उत्साहाने पार पाडली.

शिल्पकार चरित्रकोश ३२९