पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड मिसर, भास्कर जगन्नाथ कौशल्य पणाला लावले. १९८२ ते १९८६ या कालावधीत ते महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे संचालक होते. याच कालवधीत त्यांनी बोर्ड ऑफ टेक्निकल एक्सामची जबाबदारीही सांभाळली, तर १९८४ ते १९८९ या कालावधीत मिरानी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव होते. १९८९ मध्ये त्यांना भारतीय चरित्रकोश मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या चिन्मळगुंद विशेष प्रशासकीय तंत्रज्ञ पुरस्काराने गौरवण्यात आले.याच वर्षी ते इंडियन रोड काँग्रेसचे अध्यक्षही होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील एकूण पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मिरानी यांनी सार्वजनिक बांधकामासंबंधातील विविध समित्यांवर मार्गदर्शक म्हणूनही काम पाहिले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या मार्गदर्शक समितीचे ते सदस्य सचिव होते.जे.आर.डी.टाटा या समितीचे अध्यक्ष होते. सहाव्या पंचवार्षिक योजनेतील केंद्र सरकारच्या राज्य रस्तेबांधकामाचा आराखडा तयार करणार्‍या समितीचे ते अध्यक्ष होते.तर आठव्या पंचवार्षिक योजनेच्या रस्ते आराखडा समितीचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.महाराष्ट्र, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांतील सार्वजनिक बांधकामासंबंधातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.

 इंडियन रोड काँग्रेसच्या जर्नल्समध्ये मिरानी यांचे चौपन्न संशोधन प्रकल्प सादर केले आहेत.यातील अनेक प्रबंधांना पुरस्कार प्रदान करण्यात आले असून विशेष प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. १९८९ मध्ये मिरानी यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्वोच्च पदी म्हणजेच प्रधान सचिव या पदावर करण्यात आली. याच पदावरून ते १९९१ मध्ये निवृत्त झाले.मिरानी यांना इंडियन कॉन्क्रीट इन्स्टीट्यूटच्या लाइफ टाईम  अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड तसेच इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स या संस्थेच्या विशेष सेवा पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
 निवृत्ती नंतरही मिरानी यांनी शासनाच्या विविध समित्यांवर सल्लागार म्हणून काम केले.बेंगलोर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथोरीटीचे तांत्रिक सल्लागार म्हणून त्यांनी १९९१ ते ९५ या कालावधीत काम केले.याच काळात ते सिडकोचे संचालक देखील होते.मुंबईतील मल्टीप्लेक्स मधील आपत्कालीन नियंत्रण समितीच्या तज्ज्ञ समितीचे ते अध्यक्ष होते. मिरानी सध्या मुंबई( वरळी)  येथे स्थायिक झाले आहेत.

- संध्या लिमये

मिसर, भास्कर जगन्नाथ भारतीय पोलीस सेवा, २३ एप्रिल १९३५ कायद्याच्या चौकटीत राहून कायदे राबविताना त्यामध्ये लोकसहभाग करून घेण्याचे वेगवेगळे यशस्वी प्रयोग करणारा पोलिस अधिकारी अशी श्री. मिसर यांची थोडक्यात ओळख सांगता येईल. मिसर यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण पिंपळगाव व नाशिक येथे झाले. बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी त्यांनी प्राप्त केली त्यानंतर पुणे येथील आयएलएस लॉ कॉलेज येथून १९६८ साली कायद्याची पदवी घेतली. कायद्याचा अभ्यास करीत असतानाच आय.पी.एस.साठी निवड झाली व त्यांची भारतीय पोलिस सेवेतील कारकीर्द सुरू झाली. भारतीय पोलिस सेवेत असताना अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. १९५८ला प्रशिक्षण घेऊन १९५९ साली ते प्रथम अमरावती येथे रूजू झाले. त्यानंतर १९६१ साली ते पुण्यात रूजू झाले. त्यानंतर १९६५ शिल्पकार चरित्रकोश