पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ ते हो । प्रशासन खंड एन. रघुनाथन संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. रेल्वेमार्गातील पुलांच्या मजबुतीच्या दृष्टीने एकबोटे यांनी या संशोधन काळात एक संहिता तयार केली. १९८२ ते १९८९ या कालावधीत ते चर्चगेट येथील रेल्वेच्या कार्यालयात उपमुख्य अभियंता व मुख्य अभियंता या पदावर असताना लोहमार्गची देखभाल आधुनिकीरणाचे काम त्यांच्याकडे आले. त्या वेळी त्यांनी लोहमार्गाच्या व्यवस्थापनाचे पूर्णत: संगणकीकरण केले. त्यामुळे सर्व अहवाल अद्ययावत राहू लागले आणि सर्व इत्थंभूत माहिती मिळून लोहमार्गाच्या कामातील गुणवत्ता वाढली. याच विभागात १९९५ साली एकबोटे यांना मुख्य ट्रॅक अभियंता या पदांवर काम करावयाचा अनुभव मिळाला व असताना त्यांना पश्‍चिम रेल्वे च्या पूर्ण रेल्वे ट्रॅकचे काम देण्यात आले. या वेळी मुंबईच्या उपनगरी रेल्वेत लाकडी रूळपट्ट्या (स्लीपर्स) होते व त्यांच्या देखभालीत बर्‍याच अडचणी येत कधीकधी रेल्वेमार्ग बंद पडण्याचे प्रकार घडता व त्यामुळे लोकल उशिराने येत असत. पर्यायाने जनतेची गैरसोय होत असे. सर्व रूळपट्ट्या काँक्रिटच्या करण्याचे काम सुरू केले व ते २-३ वर्षांत पूर्ण झाले. क्राँक्रिटच्या रूळपट्ट्यांच्या वापरामुळे रेल्वेमार्ग बंद पडण्याचे प्रकार घडणे थांबले. १९९३ साली त्यांची हुबळी येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकालात हुबळीच्या पूर्ण डिविजनचे गेज परिवर्तन (मीटर गेज ते ब्रॉड गेज १९९३-९५ ह्या काळात झाले.) त्या कामामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. ११ डिसेंबर १९९३ रोजी पुण्यातील फुरसुंगी येथील रेल्वे रूळ ओलांडणार्‍या एका सहल बसला सह्याद्री एक्स्प्रेसच्या धडकेने अपघात झाल्यामुळे त्या बसमधील ४० चिमुरड्या शाळकरी मुलांना आपल्या प्राणास मुकावे लागले. या वेळी एकबोटे यांनी ताबडतोब हुबळी येथून पुण्याला जाऊन परिस्थिती हाताळली होती. मृतांच्या नातेवाइकांना योग्य आर्थिक मदतही मिळवून दिली होती. १९९८ ते २००१ ह्या काळात एकबोटे हे पश्‍चिम रेल्वेत मुख्य अभियंता या जबाबदार पदावर होते व त्या काळात पश्‍चिम रेल्वेची अभियांत्रिकी विभागात चांगली प्रगती झाली. २६ जानेवारी २००१ला झालेल्या गुजरातचा भूकंपात रेल्वेच्या संपत्तीचे (ट्रॅक, कॉलनीतील घरे) प्रचंड नुकसान झाले होते; पण सर्व अडचणींवर मात करुन लगेच अठ्ठेचाळीस तासात रहदारी परत सुरू करण्यात आली होती. पश्‍चिम रेल्वेला या बद्दल त्याकाळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कडून प्रशस्तिपत्र मिळाले होते. २००१ ते २००३ या कालावधीत रेल्वे बीड (रेल्वे मंत्रालय) येथे अपर सदस्य या अतिशय जबाबदारीच्या व महत्त्वाच्या पदावरून २००३ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी मोनार्क सर्व्हेअर्स या कंपनीमध्ये मार्गदर्शक म्हणून काम केले. सध्या कामातून पूर्णत: निवृत्त होऊन ते पुण्यात स्थायिक झालेले आहेत. - दत्ता कानवटे

एन. रघुनाथन भा.प्र.सेवा,मुख्यसचिव-महाराष्ट्र राज्य मार्च १९३६ - ३ जुलै २०१० एन. रघुनाथन यांचा जन्म नवी दिल्लीत झाला. त्यांचे वडील एका केंद्रीय कार्यालयात लघुलेखक (स्टेनो) होते. दिल्लीच्या सेंट स्टिफन्स शिल्पकार चरित्रकोश