पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
जहाल वेदनांची विषण्ण गीते : ‘ज्वाला आणि फुले'



 ज्यांचे कार्य हेच एक जिवंत महाकाव्य होतं, अशा बाबा आमटे यांनी समाजकार्याइतकंच साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिलं आहे, हे फार कमी लोकांना माहीत असावं. बाबा आमटे यांचं जीवन, कार्य, वक्तृत्व सारं काव्यभारीत होतं. विचार व आचारांची सुसंगती हे त्यांच्या महात्म्याचं खरं रहस्य. त्यांनी जे लिहिलं ते सारं विचारप्रवण, कृतीकेंद्री नि म्हणून वाचकास अंतर्मुख करणारं ठरलं. गद्य नि पद्य अशा दोन्ही शैलीत लिहिलेलं त्यांचं समग्र साहित्य - कृती, विचार नि कलात्मकतेचं संयुक्त रूप होतं. माती जागवील त्याला मत', रेतीचे बंध', ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी' (श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ), ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन' हे त्यांचं गद्य लेखन म्हणून सांगता येईल. पैकी 'माती जागवील त्याला मत' हा सन १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी लिहिलेला ‘मतदाराचा जाहीरनामा' होय. तर ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन स्वयंसेवी संस्थांच्या अनागोंदी कारभारावर क्ष किरण म्हणावं लागेल. 'वर्कर्स युनिव्हर्सिटी' आहे त्यांची दीर्घ मुलाखत. वि. स. खांडेकरांनी त्याचं वर्णन ‘ज्वलंत व्यक्तिमत्त्वाचा काव्यात्मक आविष्कार' असं केलं आहे. एका कृतिशील कार्यकत्र्याचं प्रकट चिंतन म्हणून सर्व काळात मार्गदर्शक ठरावा असा दस्तऐवज होय. पण साहित्यिक, चिंतक, कलाकार, कार्यकर्ता म्हणून बाबा आमटे ज्यांना समजून घ्यायचे आहेत, त्यांना त्यांचा काव्यसंग्रह ‘ज्वाला आणि फुले' वाचायलाच हवा.

 माझ्या वाचन विकासात साने गुरुजी, वि. स. खांडेकर, खलील जिब्रान, स्टीफन झ्वाइग, प्रेमचंद, यशपाल असे अनेक भाषिक साहित्यिक भेटले, भिडले. प्रत्येक साहित्यिकाची एखादी उल्लेखनीय रचना तुमच्या आयुष्यात अविस्मरणीय बनून जाते. ती साहित्यकृती तुमच्या आयुष्यात

शब्द सोन्याचा पिंपळ/४७