फूट उंचीचे पुतळे लेण्यांत आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या सरळ व वांकड्या रेघांनी
केलेल्या नकशांचे प्रकार तर अनंत आहेत. दोन दोनशें फूट लांब, पन्नास, साठ फूट
रुंद, व ऐशी, शंभर फूट उंच अशा इमारती अखंड दगडांत कोरलेल्या आहेत. यावरून
त्यांच्या भव्यपणाची कांहीं थोडी कल्पना येईल.
या इमारती ज्या सामानाच्या केल्या आहेत तें सामान लांकडासारखें मऊ व
सहज सांधणारें नाहीं; तें लोखंड वगैरे धातूंसारखें लवचीक अगर पातळ करून ठशांत
ओतण्यासारखें नाहीं; तें यारी व दोरखंडांनी इकडून तिकडें वाहून नेऊन जोडण्या-
सारखें नाहीं; तें छिन्नीनें तोडून टांकीनेंच घडावें लागतें. हैं हजारों वर्षे हवा व पाण्याला
दाद देणार नाहीं असें मजबूत आहे; माथ्यावर सबंध डोंगराचा बोजा सहन करील
असे सहिष्णु आहे; व टांकीनें घडून वडाच्या किंवा आंब्याच्या पानाच्या शिरानशिरा
दाखावतां येतील असें सुघड आहे. अशा या काळ्या दगडावर नुसत्या मातीचा गिलावा
केला आहे व या गिलाव्यावर साध्या पाण्याच्या रंगानें चित्रे काढली आहेत, ती आज
निदान दोन हजार वर्षे जशींच्या तशींच आहेत ! पाश्चात्यांचें तेलांतल्या रंगांचें चुन्याच्या
गिलाव्यावरील अगर कापडावरील चित्र शंभर वर्षांत फिक्कें पडतें ! हेंच तर येथे
मोठें कसब !!
हिंदुस्थानची संस्कृति फार विलक्षण व अतिप्राचीन आहे. पाश्चात्य समाज शास्त्र,
माणसांची उत्क्रान्ति रानटीपणापासून होत होत आली आहे असे म्हणतें. परंतु हिंदु-
स्थानाला हा नियम लागू नाहींसा दिसतो. वेदाच्या अतिप्राचीन ग्रंथापासून ते माहि-
जोदडो येथील अवशेष किंवा कोरीव लेणी यापर्यंत कोठेंही नजर फेंकली तरी हिंदु-
लोक रानटी असल्याचा पुरावा सांपडत नाहीं. जिकडे पहावें तिकडे हे लोक सुधार-
लेले व प्रगल्भ असेच दिसतात व भिल्ल वगैरे जाती आज इतके दिवस आहेत त्याच
स्थितीत आहेत. त्यांची उत्क्रान्ति होत नाहीं व दुसऱ्यांची निकृष्ठ स्थिति सांपडत नाहीं
अशी स्थिति हिंदुस्थानच्या इतिहासाची आहे.
या देशांत सामान्यतः कोणत्याही गोष्टीची शक, महिना, मित्ति ही दिलेली सांपडत नाहीं. येथे इतके राजे-चक्रवर्तीराजे, इतके शक व इतक्या प्रकारची