[तृतीय
बसत होती त्यावेळी कोणाचे अस्तित्व होते ?" असा प्रश्न करून ऋग्वेदानें त्याचे उत्तर आपणच दिले आहे.
[ ऋग्वेद, मंडल १०, सू. १२९.]
"तें (नित्य असणारे) त्यावेळी अगदी निष्पंद स्थितींत होते. त्या निष्पंदावस्थेत प्राण आणि आकाश हीही होती. त्यांचे अस्तित्वही मूळच्या निष्पंदरूपांत होते. ही अवस्था अगदीं निष्पंद असल्यामुळे विश्वाला दृश्यरूप नव्हते. याच स्थितीला अव्यक्त असे नांव आहे. अव्यक्त या शब्दाचा अर्थ निष्पंद अथवा हालचाल नसलेली स्थिति असा आहे. नव्या कल्पाला सुरवात होण्याच्या वेळी या अव्यक्तस्थितीच्या साम्यावस्थेत बिघाड होऊन ती स्पंद पावू लागते. त्यावेळी प्राणशक्तीचे धक्के आकाशावर एकामागून एक आदळू लागतात. आकाशाला असे धक्के बसू लागले ह्मणजे त्याच्या विरलावस्थेत फारच फरक होऊं लागून, तेथे घनीभवनाची म्हणजे घट्ट होण्याची क्रिया सुरू होते; आणि आकुंचन व प्रसरण अशा, शक्तीच्या दोन क्रिया सुरू होऊन