या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
कुलांचे कलंक वाढत जातील; आणि विधवांचा दुःखाग्नि अधिक आधिक पेटेल. शेवटी मी लोकांस विनयपूर्वक अशी विनंती करितों की, या गोष्टींकडे त्यांनी चांगले लक्ष्य द्यावे आणि विधवांचा विवाह शास्त्रांस संमत आहे याविषयों ज्या गोष्टी वर लि. हिल्या आहेत त्या सर्वांचा चांगला विचार करावा आणि मग विधवांचा विवाह चाल असावा किंवा नसावा याविषयों निर्णय करावा.