________________
अध्याय ५. (मूलग्रंथांत अध्याय ८.) दीर्घ तमाचे निषध विधवाविवाहास लाग नाहीत. पुढे लिहिलेल्या महाभारतातील वचनाच्या आधारावरून स्त्रीस या जगांत एकच पति असावा असे काही प्रतिपक्ष्यां चे हणणे आहे. दीर्घतमा उवाच । अद्यापति मग्यांदा मया लोके प्रतिष्ठिता। एक एव पति - यावज्जीव परायम् ॥ मृते जीवति वा तस्मिन्नापरं प्राप्नुयान्नरम् । अभिगम्य परं नारी पतिष्यात न संशयः ॥ या वचनाचा अर्थ ते असा करितात:-" दीर्वतमा म. णतो, स्त्रीला सर्व जन्मभर एकच पति असावा. तो जिवंत असतां व मेल्यावरही तिने अन्य पुरुषाबरोबर संबंध करूं नये, जर अन्य पुरुषाबरोबर संबंध करील तर ती पतित होईल यांत संशय नाही." ही व्याख्या रास्त असती तर विधवापुनर्विवाहाविषयी त्यांची अडचण कदाचित् खरी झाली असती. परंतु त्या वाक्याचा अर्थ मुळीच अगदी निराळा आहे. तो असा, "स्त्रीने यावज्जीव फक्त आपल्या पतीचेच भनसरण करावे. तो जिवंत असतां व त्याच्या मरणा. नंतरही तिने दुसया पुरुषांशी जाऊं नये इ." पुरातन काळी जो व्याभिचाराचा संप्रदाय फार चालू होता, त्याचा निषध या वाक्याने केला आहे. पुनर्विवाहाचा निषेध नव्हे. पुरातनकाली व्यभिचाराचा संप्रदाय फार चाल होता