४३
त्यांत आपली भूमिका न सोडतां दुसऱ्या व्यक्तीशीं तादात्म्य होतें किंवा
दुसऱ्या अनेक वस्तूंचें आकलन होतें आणि हें तादात्म्य किंवा आकलन
जितकें व्यक्तिसमावेशक किंवा वस्तु-समावेशक होईल तितका काव्यानंद
अधिक, हेंहि मान्य करण्यासारखे आहे. काव्यानंदानुभवांत वर
दर्शविल्याप्रमाणें इन्द्रियसुखास्वाद, आत्माभिमानाचा उत्कर्ष, आत्मसामर्थ्य-
प्रतीति, परसामर्थ्यप्रतीतीमुळे उत्पन्न होणारें आदरयुक्त कौतुक, साहचर्य-
नियमांमुळे उत्पन्न होणाऱ्या बोधपूर्व किंवा अबोधपूर्व सुखकर आठवणी,
सामान्यतः ध्यानांत न येणारें अशा वस्तुनिष्ठ किंवा प्रसंगनिष्ठ गूढ़ किंवा
गहन सत्याचें, श्रीमत्त्वाचें, ऊर्जितत्त्वाचें, उदात्तत्वाचें वगैरे ज्ञान होऊन तें
पटल्यामुळे मनाला येणारी सात्त्विक प्रसन्नता, इत्यादि अनेक गुंतागुंतीचे
धागे म्हणा, पापुद्रे म्हणा, किंवा अंगें म्हणा, असून केवळ स्वप्रतीतिपूर्वक
परव्यक्तीशीं तादात्म्य एवढ्यासच महत्त्व देणें हें गैरसमज उत्पन्न करणारें
आहे, म्हणून मी त्याला विरोध करतों.
विरोध करण्याचें आणखी एक व अधिक महत्त्वाचें कारण असें कीं,
आपण कित्येक वेळीं काव्यांतील, नाटकांतील वगैरे कोणत्याहि एखाद्या
व्यक्तीशीं किंवा सर्व व्यक्तींशीं तादात्म्य पावतों असें म्हणण्यापेक्षां त्यांतील
कोणत्याहि व्यक्तीशी तादात्म्य न पावतां सर्वोकडे एका विशिष्ट अशा दृष्टीनें
पाहत असतों असें म्हणणें वस्तुस्थितीस अधिक धरून होईल.
उदाहरणार्थ, मुंबई विश्वविद्यालयाच्या एका परीक्षेला मी परीक्षक आहे अशी कल्पना करा व शेजारी राहणारा एक मुलगा पास झाला आहे व हे मला ठाऊक आहे अशी कल्पना करा. त्या मुलाची मुंबईहून तार न आल्यामुळे तो रडत आहे, त्याची आई दुःखीकष्टी झालेली आहे, त्याचे शत्रु मनांत आनंद पावत आहेत, अशी आणखी कल्पना करा. परीक्षेचा निकाल ठाऊक असून हें सर्व मी निमूटपणे पाहात आहे व कांहीं एक न बोलतां व सूचक शब्दांनीं वगैरे व सुचवितां मी स्वस्थ बसलो आहे अशीहि एक कल्पना करा ( ही मात्र कदाचित् माझ्या ओळखीच्या माणसांना मोठी बिकट कल्पना वाटेल ! ) - तर अशा वेळी मला एक प्रकारची मौज वाटेल आणि ( मी सहानुभूतिशून्य आहे असें मानलें तर ) आनंदहि होईल. अशा वेळीं मी त्या नापास झालो म्हणून समजणाऱ्या मुलाशी किंवा त्याच्या आईशीं किंवा त्याच्या शत्रूशीं तादात्म्य