पान:विचार सौंदर्य.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

२७

लागले आहेत तेंच शोक-शृंगार वगैरे रसासंबंधानेंहि म्हणता येईल. हिंगणें येथील शाळेतील एका आठ-दहा वर्षीच्या मुलीला कुंकू न लावतां फिरल्याबद्दल मी रागावूं लागलों असतां "तात्या, मला कुंकू लावायचं नसतं" असें ती अजाण बालिका जणूं कांही आपण म्हणतो त्यांत कांहींच नाहीं अशाच भासणाऱ्या स्वरांत म्हणाली. या वाक्यांत तालबद्धता आहे का नाहीं कुणास ठाऊक. पण यमक, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अलंकार नाहींत. तरी माझ्या हृदयांत त्या वेळीं काय झालें तें माझें मला ठाऊक ! हा प्रसंग खरा घडलेला, पण असला प्रसंग काव्यांत, कादंबऱ्यांत वगैरे कवीनें वर्णिलेला वाचला तर भावनात्मक उच्चतम शोकरस उत्पन्न होईल. या काव्यांत 'अंगभूत ' असा कोणताहि अलंकार नसला तरी चालेल; किंबहुना अलंकारांनी कदाचित् रसहानि होईल !

 विशिष्ट प्रसंगाचें वर्णन करून त्या वेळी वापरलेले अलंकाररहित साधे शब्द देखील रसोत्पत्ति करूं शकतात याच अनेक उदाहरणें देतां येतील. मृच्छकटि- कांतील आपण खून करण्याचा प्रयत्न करून सवरून न्यायसभेत नुसतें 'मी नाहीं केला' (न मया ) असें म्हणतो ते शब्द; किंवा आथेल्लो शेवटच्या अंकांत दुष्ट इअॅगोला जेव्हां तलवारीने वार करतो तेव्हां इअॅगो “I bleed, Sir; but not killed. " ("मला जखम झाली आहे, पण प्राण वांचला आहे. ") असें शांतपणें व निर्लजपणें बोलतो ते शब्द; किंवा उत्तरराम- चरितांतील सीतेनें रामाविषयी आदरपूर्वक उद्गारलेले " म्हणूनच हे रघुकुलाला भूषणभूत आहेत" अशा भावार्थाचे शब्द; किंवा रामानें आपल्या परि- चारकाला "मला पूर्वीप्रमाणेंच रामभद्रच म्हणत जा " अशा आशयाचे सांगितलेले शब्द-यांत छंद नाहीं, यमक नाहीं, अलंकार नाहीं, कल्पनाविलास नाहीं, बुद्धिविलास नाहीं- असे असतां तो तो रस उत्कटतेनें उत्पन्न होतो. कित्येक वेळां तर कवी हे. प्रसंगाचा असा बनाव जुळवून आणतात कीं, तेथें विशिष्ट पात्र तुटक तुटक चांचरत बोलतें त्यांतच रस भरलेला असतो. आथेल्लोमधील (Cassio) दारूच्या निशेंत " हा माझा डावा हात आणि हा माझा उजवा हात " असें अडखळत बोलतो तें, किंवा हॅम्लेटमधील ऑफिलिआ ही वेड लागल्यावर कांहीं तरी बोलते तें, वाचकांना येथे आठवेल. “ब्रह्म म्हणजे काय ? ” असें विचारल्यावर नाम अनिर्वचनीय आहे हे स्वानु भवानें जाणणाऱ्या गुरूनें जें मौन स्वीकारले देखील "गुरोस्तु मौनं