अनेक प्रकारचा संबंध येऊन लोकांना काय पाहिजे असतें, लोकांना काय
आवडतें, कां आवडतें, वगैरे त्यांना समजलेलें आहे व लोकाभिरुचि कशी आहे
याबद्दलचें त्यांचें मत अधिकारयुक्त समजले पाहिजे. जागजागचे नवे व जुने
वक्ते, लेखक, कवि, कीर्तनकार, शास्त्री, प्रोफेसर, इतिहाससंशोधक, चित्रकार,
मूर्तिकार, गवई, बजवय्ये, वगैरे कलाविलासी किंवा शास्त्रचिकित्सक लोक
त्यांना भेटत असल्यामुळे या लोकांची ध्येयें, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे
गुणदोष वगैरे गोष्टी त्यांना जितक्या प्रमाणांत स्वानुभवानें ठाऊक आहेत
तितक्या प्रमाणांत फारच थोड्यांना ठाऊक असणार. अर्थात् वाङ्मयकले-
विषयीं व शास्त्राविषयीं नवे व जुने विचार व मनोभाव, तसेंच नवीं व जुनी
कृति, यांच्या नाड्या पाहून योग्य चिकित्सा व मीमांसा करण्यास यांना फारच
मोठा अधिकार प्राप्त झाला आहे.
केळकरांनी केवळ वाङ्मयात्मक कलाकृतीच निर्माण केल्या असत्या किंवा बहिर्मुख दृष्टीनें लोकांच्या कलाकृतीचें परीक्षण - समीक्षण केलें असतें, किंवा केवळ रसास्वादांत ते रममाण झाले असते, तर त्यांच्या वाङ्मयविषयक मीमांसेला आजचें असामान्य महत्त्व आले नसतें. लेखाच्या प्रारंभींच दिग्द- र्शित केल्याप्रमाणे आपण जें करतों तें कसें व कां करतों, आपली जी कला- कृति आहे तिचें सामान्य स्वरूप काय, तिचें ध्येय काय, तिच्यापासून आनंद कां होतो, वगैरे गोष्टींचें अंतर्निरीक्षण करण्याचें सामर्थ्य केळकरांमध्ये असल्या- मुळे वरील अधिकारांत आणखी भर पडली आहे. अंतर्निरीक्षणाची कला जितकी सोपी वाटते तितकी नाहीं. पर हृदयापेक्षां स्वहृदय जाणणे सोपें आहे असे वाटतें, पण तें वाटतें तेवढे सोपें नाहीं. कविजन परकाया प्रवेश करतात, व सज्जन लोक पर हृदय जाणतात, पण स्वहृदयप्रवेश करण्यास जी अंतर्मुख- प्रवृत्ति लागते व जी विवेचक दृष्टि लागते ती प्रत्येकांतच असते असें नाहीं. आध्यात्म-तत्त्व जाणण्याकरितां "आत्मा वै श्रोतव्यः मन्तव्यः निदिध्या- सितव्यः" असें म्हटले आहे तें 'आत्मज्ञान' सोपें म्हणून नव्हे, तर कठीण असून खऱ्या ज्ञानाला आवश्यक म्हणून याच न्यायानें वाङ्मयाच्या क्षेत्रांत देखील काव्याचा वगैरे आत्मा “ श्रोतव्यः मन्तव्यः निदिध्यासितव्यः" असे म्हटले पाहिजे आणि या वचनानुसार श्रवण-मनन-निदिध्यासाची ज्याला आवड व शक्ति असेल त्यालाच हा वाङ्मयात्मक आत्मा ज्ञात व लभ्य होईल.