१९
विपर्यास करणे होईल. प्रश्न सध्यां गौण म्हणून इतर भावना सोडून देऊन फक्त
सात्त्विक संतापाचाच विचार केला तर मला उदाहरणांनीं असें सिद्ध करून
देतां येईल कीं, वरील आरोप चुकीचा आहे. सरकारच्या दडपशाहीसंबंधानें
लिहितांना 'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीं असे देवच बोलून चुकलेला आहे '
असें व्यंगार्थपूर्ण वाक्य काय सात्त्विक संतापाशिवाय लेखर्णीतून बाहेर पडेल ?
म. रा. बोडस यांच्यावर लेख लिहून 'म. रा. बों. 'चें 'बोडण' केळकरांनीं
र्जे बाहेर काढलें होतें, शिवरामपंत परांजप्यांनीं 'ध्रुवाची गोष्ट खोटी' अशा
प्रकारचा मथळा देऊन लिहिलेल्या गोष्टीवर त्यांनीं जी गोष्ट लिहिली होती,
खाडिलकरांच्या मेनकेंत जी राजकीय कुचेष्टा आली होती तिला प्रत्युत्तर
म्हणून त्यांनीं जें लिहिलें होतें, प्रो. फडके व प्रो. घारपुरे यांनीं १९२१ च्या
राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळींत केळकरांवर जे आरोप केले होते त्यांवर
केळकरांनी शिवाजी-मन्दिरांत दोन दिवस जीं भाषणे केलीं - या व अशा
उदाहरणांचा विचार केला म्हणजे केळकरांना संसार म्हणजे केवळ वाङ्मय-
क्रीडांगण वाटत नसून प्रसंगानुसार भावनावश होऊन चार हात करणारे
ते आहेत हें कोणालाहि कबूल करावें लागेल. पण या प्रसंगी देखील
भावनावशतेच्या अनुषंगानें वाङ्मयात्मक रसास्वादलोलुपता दृग्गोचर होतेच,
हें ते ते लेख किंवा तीं तीं व्याख्यानें वाचीत असतांना वाचकांच्या ध्यानांत
आल्याशिवाय राहणार नाहीं.
आणि याचें खरें कारण असें कीं, ते कांहींहि करूं लागले तरी त्यांची वाङ्मयभक्ति डोकावतेच व आपली सत्ता गाजवतेच; इतकी त्यांना ती प्रिय, सहज व दुर्दम्य आहे. अमुक एक प्रसंगावर ते लिहूं किंवा बोलू लागले आहेत आणि त्यांनीं त्याला यथार्थ व सुंदर उपमादि अलंकारांनीं सुशोभित केलेले नाहीं असें झालेच नाहीं. इंग्लिश वाङ्मयांत 'मिडास' नांवाच्या एका राजाची एक गोष्ट आहे. या राजाविषयीं असें म्हटलेले आहे कीं, त्याचा ज्याला स्पर्श होई तें सर्व सुवर्णमय होऊन जाई. केळकरांचा हस्तस्पर्श असाच आहे,- जो विषय ते हातीं घेतात तो सुवर्णालंकृत होतो ! किंवा आपल्या इकडील वाङ्मयांत युवतींचा हस्तस्पर्श झाल्यावर लवकरच विशिष्ट वृक्ष फलपुष्पयुक्त होतात असा जो एक कविसंकेत आहे त्याचा आधार घेऊन मला असें म्हणावेंसें वाटतें कीं, एखादा रुक्ष विषयवृक्ष वाङ्मय-