९
'परिस्थिति' हा शब्द वापरण्यांत येतो, कित्येक वेळां 'परिस्थिति' हें कारण
असतें खरें, पण कित्येक वेळां या शब्दानें ज्ञानाचा केवळ आभास उत्पन्न होतो
व कित्येक वेळां तर ' परिस्थिति ' हें कारण नसून उलट कार्य असतें !
बीज आधीं कीं फळ आधीं या वादाप्रमाणें या वादाची बहुधा स्थिति असते.
हा वाद वाङ्मयक्षेत्रांतच नव्हे तर आधिभौतिक शास्त्रांत, राजकारणांत,
समाजकारणांत व इतरत्रहि दिसून येतो. आधिभौतिक शास्त्रांत प्राणिवर्गाचा
विकास कसा झाला याची उपपत्ति लावतांना लामार्क ( Lamarck ) व
डार्विन यांच्या ( सामान्यतः प्रतिपादण्यांत येणाऱ्या )'परिस्थिति 'वादी
मताविरुद्ध Vitalism, Creative Evolution वगैरे तत्त्वें प्रतिपादण्यांत
येतात. राजकारणांत, इतिहासशास्त्रांत, समाजकारणांत महाभारतांत
म्हटल्याप्रमाणें 'कालो वा कारणं राज्ञः राजा वा कालकारणम्' हा
प्रश्न निरनिराळ्या स्वरूपांत दृष्टोत्पत्तीस येतो व त्याचें उत्तर 'राजा
कालस्य कारणम्' असें, किंवा 'कालोऽस्ति कारणं 'राज्ञः' असें
निरनिराळ्या लोकांकडून देण्यांत येतें. असला कठीण, व्यापक व गुंतागुंतीचा
प्रश्न एकदोन पृष्ठांत आवरणे अशक्य आहे. तथापि अर्धवट सूत्रात्मक पद्धतीनें
माझ्या मताचें दिग्दर्शन वाङ्मयक्षेत्रांतील उदाहरणें घेऊन करता येईल.
महाराष्ट्रांतील संतवाङ्मयांत जी निवृत्ति दिसून येते तिला परिस्थिति कितपत कारणीभूत झाली हाच एक मर्यादित प्रश्न हातीं घेतला तर माझें म्हणणें थोडक्यांत सुचवितां येईल. ' काव्य आणि काव्योदय ' या पुस्तकांत प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनीं असे प्रतिपादन केले आहे कीं राजकीय दुःस्थितीमुळे हा निराशावाद उत्पन्न झाला. पण कै. वि. का. राजवाडे यांचें मत कवींच्या निराशा वादामुळे राजकीय दुःस्थिति आली असें एके काळीं होतें ! शिवाजीच्या आधींचा काळ जुलमाचा अंदाधुंदीचा होता म्हणून रामदास उत्पन्न झाले व शिवाजीहि या परिस्थितीमुळेंच उत्पन्न झाला व कार्य करूं शकला असें कांहीं म्हणतात, तर यांच्याउलट शिवाजी व रामदास या दोघांनीं ( सहकारितेनें म्हणा किंवा स्वतंत्रतेनें म्हणा ) काळाचा ओघ बदलला व नवीन काल निर्माण केला असें कांहींजण प्रतिपादितात ! कालौघाकडे जर कर्तृत्व असतें, तर कालौघामुळे ' रामदास' व 'तुकाराम' अर्शी परस्परविरोधी कार्ये कशीं झालीं ? दैन्याच्या, छळाच्या व दुर्दशेच्या काळांत - (व काळांतच नव्हे तर काळामुळें) निवृत्तिपर कवि ,