१०
झाले असें म्हणावयाचें, तर छत्रपतींच्या राज्यारोहणाच्या काळांत, किंवा
पेशवाईतल्या अटकेपार झेंडा नेणाऱ्या काळांत (व काळामुळे ) प्रवृत्तिपर
कवि निर्माण व्हावयास पाहिजे होते. पण रामदासाशिवाय दुसरे नांवच
चटकन् डोळ्यांपुढें येत नाही. शिवाजीच्या पूर्वीहि महाराष्ट्रानें 'पुलकेशी'
राजाच्या द्वारें पराक्रम गाजविला होता; त्या वेळेस किंवा लगेच तदनंतर
आशावादी कवि कोणते व किती झाले ? परिस्थितीकडे कर्तृत्व मानले तर
दुसऱ्या बाजीरावाच्या शिमगी चांदण्याच्या व मैना-राधूंच्या काळांत
तमासगीर जसे झाले, तसे मोरोपंतांसारखेहि कवि कां निर्माण व्हावे, हा
प्रश्न उत्पन्न होतो. परिस्थिति व व्यक्तिवैशिष्टय या दोहोंचा संघात किंवा
संयोग हैं कारण मानलें तर वरील कांहीं कूटें कांहीं अंग सुटतील,__अथवा
खरें बोलायचें म्हणजे, सुटल्यासारखी वाटतील ! परिस्थिति कारणीभूत
होत असली तर ती कशी होते हैं जोपर्यंत सांगतां येत नाहीं तोपर्यंत तिचें
कारणत्व स्वीकारण्यांत किंवा नाकारण्यांत विशेष अर्थच नाहीं. कार्यकारणभाव
समजल्याचें मायात्मक समाधान पाहिजेच असले तर परिस्थिति ही
‘ कांहीं अंशीं व एका अर्थानें' कारणीभूत होते असें म्हणून मोकळें व्हावें !
परिस्थिति कारणीभूत झाल्याचीं प्रो. वा. ब. पटवर्धन यांनी दिलेलीं
कांहीं उदाहरणें परीक्षणाकरितां घेऊं या. 'भोंवतालची देशरचना जशी
असेल त्याप्रमाणे कवितेची चालचलणूक असते' असे ते म्हणतात. आणि
अर्थविवरणार्थ टीपेंत अशी पुस्ती जोडतात की, 'भूप्रदेश, देशरचना आणि
हवापाणी यांच्या गुणकर्माचा कवींच्या मनावर परिणाम होतो तो, त्या त्या
कवींच्या स्वभावाप्रमाणे किंवा मनःप्रवृत्तीप्रमाणें भिन्न भिन्न होतो'. या
सिद्धान्ताच्या द्वारें प्रो. पटवर्धनांना असें का सांगावयाचें आहे, कीं नित्य
दिसणाऱ्या हिरवळीमुळे स्वभावांत हिरवटपणा येईल, किंवा प्रदेशाच्या
रुक्षतेमुळे स्वभावांत रूक्षता येईल किंवा उंच पर्वतांच्या सान्निध्यामुळे
स्वभावांत उच्चत्व येईल किंवा हिमालयाच्या जवळ राहिल्यानें स्वभावांत
थंडपणा येईल ? माझा हा प्रश्न विडंबनात्मक वाटेल व थोडासा आहेहि.
पण हें विडंबन थोडेंसें आवश्यक आहे, कारण पुष्कळ लोकांच्या मनांत या
प्रश्नाच्या बाबतींत गोंधळ असतो तो दूर करण्याला असले विडंबन आवश्यक
आहे. प्रो. पटवर्धनच उपरिनिर्दिष्ट टीर्पेत म्हणतातः -
"रुक्ष प्रदेश, नीरस भूरचना, सदा बदलणारी हवा, धबधब्याचा