हे म्हणणे अयुक्तिक व अनाधार आहे.
अलीकडे लेखकांना महाकाव्ये लिहिण्यास व ती वाचकांना वाचण्यास वेळ किंवा
फुरसत मिळत नाही म्हणून, व 'मागणी तसा पुरवठा' या न्यायाने लघुकाव्ये
व लघुकथा यांचीच फार मागणी असल्यामुळे, महाकाव्यांचा पुरवठा अलीकड़े होत
नाही, या युक्तिवादांतहि सयुक्तिकता नाही. वाचकांना महाकाव्ये वाचण्यास फुर-
सत नाही हे म्हणणे तर हास्यापदच आहे. मोठमोठया कादंबऱ्या व 'गीतारहस्यां'
सारखे मोठमोठे ग्रंथ जर अलीकडे बाहेर पडू शकतात व खपतात तर महाकाव्यां-
नींच असे काय केलें आहे की, त्यांच्या बाबतीत मात्र हा न्याय लागू पडूं नये ?
तसेच कवीला किंवा कोणत्याहि लेखकाला फुरसत नाही हे म्हणणेदेखील बहुधा व
बव्हंशी खोटेंच असते. ज्याच्याजवळ विचार आहेत, कल्पना आहेत, उत्साह आहे,
तो वेळांत वेळ काढतो व रात्रीचा दिवस करून व आपल्या विषयाशी तद्रूप होऊन
कलात्मक निर्मिति करू शकतो. अपवाद काही असतील, पण सामान्य नियम हा
असा आहे. निर्मिति झाली तरी वाचक मिळाले पाहिजेत ना, असा कोणी येथे
प्रश्न विचारला तर त्याला उत्तर असे की, कलाकृति जी निर्माण होते ती बाजारां-
तल्या खाद्य-पेयादि जिनसांच्याप्रमाप्ये 'मागणी व पुरवठा' या अर्थ-शास्त्रीय
न्यायाप्रमाणे होत नाही. काव्यनिर्मितीचे काय किंवा इतर कलाकृतीचे काय,
'अर्थ-शास्त्र' निराळेच आहे ! कलाविलासाचा आनंद इतरांना मिळावा व त्यांनी
आपली वाहवाहि करावी, असे हेतु जरी थोड्याबहुतं प्रमाणात कलानिरत मनु-
ष्याच्या मनांत वावरत असले तरी कलाकृति निर्माण करतांना रसलोलुपांची संख्या
तो मोजीत बसत नाही किंवा त्यांच्या 'वाहवा' च्या टाळ्या मधून मधून ऐकू
आल्या नाहीत म्हणून अडून बसत नाही. महाकाव्याला अनुकूल असें रम्योदात्त,
रम्यविशाल, रम्याद्भुत, रम्यभीषण इत्यादि प्रकारचे विषयच अलीकडील व्यावहा-
रिक, शास्त्रीय, नीरस, गद्यात्मक जगांत मिळत नाहीत ही रडहि अशीच निरर्थक
आहे. आधी कोणताहि काळ गद्यात्मक असतो हे म्हणणेच खोटें आहे. काळ
गद्यात्मक नसतो, तर मन गद्यात्मक असते. पाहणान्याला काव्य सगळीकडे आहे;
कान्यदृष्ट्या जो अंधळा असेल त्याला सगळे जगच अंधळे व अंधाराने भरलेले
दिसावयाचे. पूर्वी काव्याला विषय चांगले मिळत व हल्ली मिळत नाहीत या म्हण-
ण्यात अर्थ काय ? पूर्वी युद्धे किंवा महायुद्धे होत होती आणि अलीकडे होत
३