पान:विचारसौंदर्य.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

पण समर्पक उपमा द्यावयाची म्हणजे गणितांतील ' असंपाति ' रेषेची ( Asymptote ची) देता येईल. ' असंपाति' रेषा अशी असते, की तिच्या स्वाभाविक दिशेने ती लांबविली असतां दुसऱ्या एका विशिष्ट वक्र रेषेजवळजवळ जाण्याकडे तिची प्रवृत्ति असते, पण अनंततेपर्यंत लांबविली तरी ती स्पर्श कधीं करूं शकत नाही. असंपाति रेषेची इंग्लिशमध्ये अशी व्याख्या केलेली आहे "Asymptote is a line which approaches nearer and nearer to some curve but though infinitely extended would never meet it." पोहतांना आपण पाण्यात बहुतेक बुडलेले असतो, पण पूर्णपणे कधी बुडत नाही, आणि बुडी घेतली तर लगेच बाहेर येतो, त्याप्रमाणेच काव्यरससागरांत क्रीडार्थ अवगाइन करीत असतां 'स्व' ला आपण पूर्णपणे बुझू द्यावयाचे नाही, तर डोके वर ठेवून पोहत असावयाचे आणि असे केले तरच अलौकिक आनंद होईल. नाही तर आपत्ति ओढवावयाची !
 (आणि अशी एकदा आपत्ति ओढवली होती म्हणतात. आमच्या गांवीं एकदा नारसिंह अवताराचा अभिनय करतांना एक गांवकरी भंगट नट इतका आपल्या भूमिकेशी तादात्म्य पावला की हिरण्यकश्यपूची भूमिका घेणाऱ्या नटाचा तो खरोखरी प्राण घेऊ लागला आणि मग श्रोतृवर्गातील काही लोकांना रंगभूमीवर जाऊन बिचाऱ्या हिरण्यकश्यपूवेषधारी नटाला प्राणान्तिक संकटांतून पांचवावे लागले ! पूर्ण तादात्म्याचा हा असा परिणाम होतो!)
 आतां अधिक विस्तार न करतां काव्यानंदांतील सविकल्यत्व मान्य करून सवि कल्प समाधी' पासून आनंद होतो हे में केळकरांचे म्हणणे त्याचा विचार करूं या. केळकर म्हणतात, वाचक आपली भूमिका न सोडतां मनाप्रमाणे दुसऱ्या भूमिकेवर किंवा भूमिकांवर संक्रमण करतो व या अर्थाने जगाचे आकलन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अल्पांशाने पुरी होते म्हणून त्याला आनंद होतो आणि जितक्या अधिक भूमिकांशी त्याचे तादात्म्य होईल (अर्थात् सविकल्प तादात्म्य होईल) तितका त्याला अधिक आनंद होईल. आतां सर्व जगाचे आकलन करून घ्यावें अशी जीवाची सुप्त आणि नेणिवेतली तरी महत्त्वाकांक्षा असते हे खरे आहे. त्याचप्रमाणे हे आकलन झाले असतां आनंद होतो हेहि खरे आहे. एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव समजला, किंबहुना एखाद्या वस्तूचे नांव जरी समजले, तरी

३०