पान:विचारसौंदर्य.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

तो बाजूला राहून टीकाकार अप्रस्तुत गोष्टींबद्दल उगाच वाद घालीत बसतात. आतां नीतिदृष्टीची आणि काव्यदृष्टीची अगदी फारकत आहे की काय, म्हणजे कवि, चित्रकार वगैरेनी नीति-अनीतीचा विचार न करता केवळ कलाक्लिास म्हणून पाहिजे ते वाग्विलास किंवा चित्रात्मक विलास करावेत काय हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पण तत्पूर्वी केळकरांनी या विषयीं जें सुंदर विवेचन केले आहे ते त्यांच्या बडोदे येथील व्याख्यानांतून लहान उतारा घेऊन सांगतो.
 " कलाविलासाच्या मागे हेतुसंशोधनाचा गुप्त पोलीस लावून दिला तर अनथे- कारक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. वाङ्मयाला नैतिक प्रबंध म्हणणे आणि साखरभाताला नुसत्या साखरेचा केलेला भात म्हणणे ही दोनहि सारख्याच समंजसपणाची होत. शिल्पशास्त्रांत कलेच्या दृष्टीने निरनिराळे आकार बनविणे यांत प्रतिभाकौशल्य दिसून येते. पण देवळाचे उंच शिखरच सुंदर कां, तर ते आकाशांत ईश्वर आहे असे उंच बोट करून दाखविते म्हणून, अथवा तीन तीन कमानींची जोडीच कां शोभते तर तिजवरून त्रिमूर्ति ब्रह्मा-विष्णू-महेश्वराची आठवण होते म्हणून, असे म्हणणे बरोबर होईल काय ? ताजमहालाच्या पांढऱ्या शुभ्र दग- डांत जी रंगीबेरंगी कुसर बसविली आहे तिचा नैतिक हेतु शोधून काढणाराने ताजमहाल पाहण्यास जाण्याचे श्रम न घेतलेलेच बरे. चित्रकार पौराणिक किंवा ऐतिहासिक चित्रे रंगवितो तेव्हां त्याचा हेतु कलेच्या दृष्टीने सुंदर चित्रे रंगविण्याचा असतो की नीतिबोध करण्याचा असतो ? पोहावयास पडणारा मनुष्य जलक्रीडा करतो ती स्नानाच्या हेतूने नव्हे, शिकारी क्षत्रिय अरण्यांत मृगयाविलास. करतो ती एक दिवस चांगले मांस खावयाला मिळावे म्हणून करीत नाही ! गवई दीप-राग आळवितो तो अर्थशास्त्रदृष्ट्या मशालजीचा खर्च वाचविण्याकरितां नव्हे. तात्पर्य, 'अधिकस्याधिकं फलं ' या न्यायाने, कलेच्या दृष्टीने वाङ्मय सुंदर असून त्यातूनच नीतिबोध निघण्यासारखा असल्यास दुधात साखर पडेल; पण ज्याचा मूळ हेतु नीतिबोध नाहीं तें वाङ्मयच नव्हे हे म्हणणे अयाधि का शुद्ध निरपेक्ष आनंद हाच कलेचा हेतु व तेच फळ होत शेवटल्या वाक्यांतील 'आनंद' या शन्समार्गी आहे ते फार महत्त्वाचे आहे. कला ही नीतीची दासी नसेल, कलेने आत्मप्रसादा- करितां स्वतःच्या मनाला 'पूत' वाटेल ते करावे व मातीची फाजील प्रतिष्ठा ठेवू

25