पान:विचारसौंदर्य.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचारसौंदर्य

'ध्वनि' असतो आणि तो रसोत्पादक असतो यात शंका नाही.
 तात्पर्य, कवींनी, नाटककारांनी, कादंबरीकारांनी वगैरे असे प्रसंग वर्णिले आहेत की तेथे साध्या शब्दांनी देखील उच्चतम रसोत्पत्ति झाली आहे. यापुढे जाऊन असेहि म्हणता येईल की, त्या प्रसंगी अलंकारिक भाषा कोणी वापरली आहे अशी कल्पना केली तर तेथे रसहानि झाली असती!
 अलंकारादिकांची काव्याला आवश्यकता नाही असे केळकर कबूल करतात, पण त्यांचा स्वाभाविकपणेच सालंकार वैदग्ध्याकडे व लालित्याकडे कल असल्यामुळे ते त्यांना जे महत्त्व देतात ते मला पसंत नाही. (हे फाजील महत्त्व देण्याचे एक कारण असे दिसते की, रस व अलंकार यांत तत्त्वतः ते भेद मानीत नाहीत, अलंकार हा रसाचाच जणू काही प्रकार आहे असे ते मानतात. " रस व अलंकार यांच्या स्वरूपांत वास्तविक इतकाच फरक की, रसाचे स्थायिभाव जीवसृष्टीच्या भावनांवर अधिष्ठित असतात व अलंकाराचे स्थायिभाव अचेतन सृष्टीवरहि अधिष्ठित होऊ शकतात.") असो. अधिक विस्तार नको. खरे म्हटले म्हणजे वर निर्दिष्ट केलेल्या प्रसंगांसारखे प्रसंग वर्णन करून स्वाभाविक रसोत्पत्ति करण्याकडे लेखकांची अधिकाधिक प्रवृत्ति व्हावी म्हणूनच या मुद्दयाचा एवढा तरी प्रपंच केला, बांकी तत्त्वतः आमचा मतविरोध आहे असे मुळीच नाही.
 काव्यानंदाला कारणीभूत वाग्विलास असतो, मग हा विलास प्रधानत्वे करून भावनारम्यत्वमूलक, कल्पनावैभवमूलक किंवा बुद्धिवैभवमूलक असो. वाग्विलास हा अलंकारांच्या काय व रसांच्या काय मुळाशी असतो. या दृष्टीने रसाचे व अलं- काराचे मी एकरूपत्व मानूं शकेन. तसेंच भावनांचा, कल्पनांचा व बुद्धीचा परस्परांशी अत्यन्त निकट संबंध असतो, इतका की ती एकमेकांच्या अंगभूत आहेत, या अर्थानेहि मी रसाचे व अलंकाराचे एकरूपत्व मानूं शकेन. पण सामान्य दृष्टीने पाहतां रस व अलंकार यांमध्ये जो भेद मानिलेला आहे तो महत्त्वाचा आहे व त्याकडे दुर्लक्ष करणे युक्त नव्हे म्हणून आणि काव्यादि वाङ्मयप्रबंध ऐतिहासिक, आधिभौतिक ज्ञान देण्याकरिता किंवा नैतिक उपदेश करण्याकरितां नसतात हे केळकरांनी अनेक ठिकाणी अनेक तन्हांनी सांगितले आहे ते ध्यानात धरण्यासारखें आहे. कीर्ति, अर्थप्राप्ति, सदुपदेश हे हेतु गौण व आनुअंगिक होत, ते प्रधान नव्हेत हे ध्यानांत न धरल्यामुळे कित्येक वेळां कवीचा इष्ट हेतु जो काव्यानंद देणे

२४