प्रत्येक शब्दाला महत्त्व येतें ही गोष्ट खरी असली तरी ती सध्या माझ्या मनांत
नाही. मी हा लेख लिहितांना राजकीय दृष्टि अजीबात वगळलेलीच आहे. केळकर
यांची वाङ्मयमीमांसा मला विशेष मननीय वाटते ती त्या मीमांसेच्या राजकीयेतर
व स्वतःसिद्ध गुणांमुळेच होय. एक तर वर दर्शविल्याप्रमाणे केळकरांची वाङ्मय-
क्षेत्रांत "आधी केलें मग सांगितले" अशा प्रकारची स्थिति आहे. ते केवळ ;
टीकाकार नव्हेत, तर कथा-नाटक-निबंधादि वाङ्मय स्वतः लिहून नांव मिळ-
विलेले टीकाकार आहेत. कान्यहि त्यांनी लिहिलेले आहे व ते उच्चतम दर्जाचे
नसले तरी त्यांत बरेच गुण आहेत. चरित्र, ऐतिहासिक निबंध, प्रवासवर्णने,
वगैरे अनेक प्रकारचे लेख त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत. अर्थात् वाङमय-निष्पत्ती
संबंधी व वाङ्मयकलेसंबंधी त्यांना स्वानुभवावरून बोलण्यासारखे पुष्कळ आहे
आणि अनुभवाच्या बोलाची केव्हांहि किंमत विशेष असणार.
दुसरी गोष्ट अशी की, ते बहुश्रुत आहेत. त्यांनी मराठी, इंग्रजी व संस्कृत
मिळून जितके ग्रंथ वाचले असतील तितके वाचलेले लोक फारच विरळा; महाराष्ट्रांत
तरी फारच थोडे. (माझ्या डोळ्यांपुढे चिंतामणराव वैद्यचे तेवढे सध्या उभे
राहत आहेत.) कायद्यासंबंधी व वर्तमानपत्रांतील हरत-हेच्या विषयांसंबंधी जी
पुस्तकें व जे लेख वाचले असतील ते सोडून दिले तरी शेक्सपिअर, गोल्डस्मिथ,
जॉन्सन, अॅडिसन, बर्क, रस्किन, कार्लाइल, गटे, लेसिंग, इत्यादि जुने तसेच
अलीकडचे बिरेल, शॉ, गॅल्सवर्दी, गार्विन, व्रडले, वगैरे पाश्चात्य लेखक त्यांनी
इतके वाचले आहेत की त्यांची यादी सहज छापील पांच दहा पाने होतील इतकी
लांबेल. मराठीतील बरेच जुने कवि, आधुनिक मराठीतील बहुतेक सर्व गद्य
लेखक व बरेचसे कवि यांचा त्यांना चांगला परिचय आहे. संस्कृतमधील बहुतेक
प्रसिद्ध नाटके व साहित्यशास्त्रावरील बरेचसे ग्रंथ ही त्यांनी अभ्यासिली आहेत.
आणि तीनहि भाषांतील हे ग्रंथ मार्मिकपणे आणि रसास्वादाच्या दृष्टीने वाचलेले
आहेत, केवळ परीक्षेकरितां किंवा विद्वत्प्रदर्शनाकरितां नव्हे.
त्यांच्या रसिकत्वाच्या जोडीला त्यांचा स्वभावजन्य समतोलपणा आणि त्यांची
सविवेकता हे गुण त्यांना लाभले आहेत. शिवाय केसरीचे संपादक व राजकीय
पुढाऱ्यांपैकी एक या नात्याने त्यांचा अनेक व अनेकविध लोकांशी अनेक प्रकारचा
संबंध येऊन लोकांना काय पाहिजे असते, लोकांना काय आवडते, का आवडते,
१७