पान:विचारसौंदर्य.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

आहे त्याचा आधार घेऊन मला असे म्हणावेसे वाटते की, एखादा रुक्ष विषयवृक्ष वाङ्मयपुस्पांनी प्रफुल्लित झालेला पाहावयाचा असल्यास केळकरांचा त्याला हस्तस्पर्श करवावा म्हणजे इष्ट हेतु साध्य होईल! कविसंकेताप्रमाणे पाहतां काही विशिष्ट वृक्षा- संबंधींच युवति या प्रभावशाली होतात; पण केळकरांचे प्रभावशालित्व सर्वगामी आहे. केळकर सिमल्याचे वर्णन करोत किंवा विलायतेहून पत्रे पाठवोत; इतिहास- संशोधनाबद्दल चर्चा करोत किंवा 'मराठे व इंग्रज' यांच्या संबंधाचे निरीक्षण करोत; निर्यमक कवितेबद्दल लिहोत किंवा टिळकांच्या आठवणींना प्रस्तावना लिहोत; ' तोतयाच्या बंडा' वर नाटक लिहोत किंवा 'माझी आगगाडी कशी चुकली' याविषयीं लघुकथा लिहोत; ' संस्कृत विद्येचे पुनरुजीवन' करूं पाहोत किंवा वर्तमानपत्रांतील जाहिरातींचे महत्त्व वर्णन करूं लागोत, जो विषय या साहित्यभक्ताच्या व रसज्ञ ज्ञानयोग्याच्या आणि वाङ्मयकलापटु कर्मवीराच्या हाती येईल त्यांत बहुश्रुतता, वैदग्ध्य, माधुर्य, सालंकारत्व, रसप्राचुर्य, रसलोलुपता इत्यादि गुणांची भर पडून तो खुलून दिसावयाचाच व फुलून जावयाचाच.
 त्यांच्या लिखाणांची विविधता व सुरम्यता पाहून त्याला एखाद्या मोठ्या उद्या- नाची किंवा कलात्मक वस्तुसंग्रहाची उपमा द्यावीशी वाटते. या विस्तृत उद्यानाचे किंवा कलात्मक वस्तुसंग्रहाचे निरीक्षण किंवा परीक्षण करावयाचे म्हटले म्हणजे राजकारणातील 'फोडा आणि झोडा' या भेदनीतितत्वाचा अंगीकार करून एकेका भागाचा एकेकदा समाचार घेतला पाहिजे. आणि या दृष्टीनेच प्रस्तुत लेखांत केळकरांच्या सर्व वाङ्मयकलाविलासांसंबंधी न लिहितां त्यांनी अंतर्मुख होऊन वाङ्मयकृतींबद्दल, म्हणजे त्यांच्या स्वरूपाविषयीं, तत्त्वांविषयीं वगैरे जे बरेचसें लिहिलेले आहे त्यापैकी काहींचे थोडक्यांत सारांश रूपाने वर्णन करून त्यांतील गुणदोषांचे दिगदर्शन करावयाचे आहे. प्रस्तुत लेखांत त्यांच्या काव्यांबद्दल चर्चा येणार नाही, तर काव्यांविषयी त्यांनी काय लिहिले आहे याविषयी येईल. त्यांचे गद्यपद्यप्रबंध नानाविध व रसपूर्ण आहेत; पण त्या सर्वांविषयीं न लिहितां गद्य- पद्याविषयीं, यमकांविषयीं, काव्याविषयीं, रसास्वादाविषयीं वगैरे त्यांनी जे लिहिलेले आहे, त्याविषयी या लेखांत विवेचन करावयाचे आहे.
 केळकरांच्या वाङ्मयमीमांसेला विशेष महत्त्व अनेक दृष्टींनी आलेले आहे. राजकारणांत बरेच महत्त्व असलेल्या 'केसरी' चे ते संपादक होते म्हणून त्यांच्या

१६