पान:वनस्पतीविचार.djvu/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें.] शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वासक्रिया. १९७ शरीर आपोआप त्या आम्लांत विरघळून जाते. किड्याचे शरीरांत असणारे सेंद्रिय पदार्थ चटू सारे नाहीसे केले जातात, प्राणिशरीरांत अन्न भक्षण केल्यावर पोटामध्ये पाचक आम्लाचा परिणाम होऊन तें अन्न विरघळून जाते व त्यांतील पोषक पदार्थ उपयोगांत आणिले जातात. तद्वतच ह्या वनस्पति पाचक आम्ल त्यावर सोडून किड्यांतील सेंद्रिय पदार्थ उपयोगांत आणितात. काही वनस्पतीचे शरीरावर पिंडमय कैंस असतात. एकंदर शरीराचा देखावा मनोहर असतो. किडा किंवा मुंगी आली म्हणजे केसांतून एकप्रकारचा रस उत्पन्न होऊन त्यांस ते अडकवले जातात. जर किड्याने सुटून जाण्याकरितां ज्यास्त धडपड केली, तर इतर केंसास ज्यास्त उत्तेजन मिळून पुष्कळ चिकट रस चोहोबाजूने त्या किड्याभोवती येऊन त्या रसांत तो किडा पूर्ण गुटमळला जातो, व शेवटी तो मरतो. मग वरीलप्रमाणे त्याचे शरिराचे सेंद्रिय पदार्थ उपयोगांत आणिले जातात. ह्या वरील प्रकारापेक्षा आणखी निराळा प्रकार पुष्कळ वेळां पाहण्यांत येतो की, ज्याचे योगाने दोन परस्पर भिन्न वनस्पति एके ठिकाणी संयोग पावून परस्पर फायदा करून घेतात. दोघांनाही परस्परांची जरूरी असते. एका वनस्पतीस एक कार्य करितां येते; पण ते दुसऱ्यास करितां येत नाही. तसेच दुसन्यास में करितां येते, ते पहिल्यास करितां येत नाही. म्हणून दोघांचा संयोग झाला असतां दोन्ही परस्पर कार्य करून 'देवाण घेवाण' या न्यायाने परस्पर उपयोग करितात. क्षुद्र वर्गापैकी आळंब्या व तसेंच शैवाल हरितंवर्ण ह्यांचा पुष्कळ वेळां संबंध येतो, व हा संयोग दोघांच्या जीवनक्रमांत महत्त्वाचा असतो. हरित्वनस्पतीस हवेतून कार्बन्वायु शोषून त्यापासून सात्त्विक सेंद्रिय पदार्थ बनवितां येतात; पण अशास पाण्याची जरूरी असते. आळंब्या हवेतून पाणी शोषून त्यास पुरवतात. तसेच ज्या पदार्थावर ही संयोगस्थितीत वाढतात, त्यापासून निरिंद्रिय द्रव्ये शोषून जेव्हां हरितवनस्पतीमध्ये येतात, त्या वेळेस ती वनस्पति हवेतून कार्बन्वायु शोषून त्यांपासून सात्विक सेंद्रिय पदार्थ बनविते. हे तयार असलेले सात्विक सेंद्रिय पदार्थ आळंबीस उपयोगी पडतात; कारण तिला असले पदार्थ बनविता येत नाहीत. पण हे तयार करण्यास जरूर लागणारे पाणी तसेच निरिंद्रिय द्रव्ये ही हरितवनस्पतीस