पान:वनस्पतीविचार.djvu/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ वनस्पतिविचार. - [प्रकरण mamrammar अन्य प्रकारे अन्न-द्रव्ये शोषण करितात. वरील नियम साधारण वनस्पतीचा असतो. असल्या वनस्पति दोन्ही उच्च तसेंच क्षुद्र वर्गामध्येही आढळतात. आळंब्याचा वर्ग सेंद्रिय पदार्थ तयार करूं शकत नाही. त्या वनस्पतीत हरितवर्ण नसतो. अशांना तयार सात्त्विक सेंद्रिय पदार्थ मिळाले पाहिजेत, म्हणजे त्यांची वाढ होते. म्हणून आळंव्या सेंद्रिय पदार्थावर वाढलेल्या आढळतात; त्या पदार्थामधून सेंद्रिय पदार्थ खाऊन आपलें पोषण करितात. भूछत्रे (Mushrooms ) नेहमी मृत सेंद्रिय पदार्थावर उगवतात, त्यांस ते पदार्थ तयार करिता येत नाहीत, म्हणून घाणेरडे सेंद्रिय पदार्थ भक्षण करून आपली उपजीविका करितात. उच्च वर्गामध्ये सुद्धा ह्या वनस्पति आपली मुळे दुसन्या झांडांच्या शरीरांत खुपसवून अन्न शोषण करितात. ह्यापैकी काहींना आपले भक्ष्य स्वतंत्रपणे तयार करितां येते. ज्या वेळेस मूळ झाडांची पाने गळून नवीन सेंद्रिय पदार्थ पूर्वीप्रमाणे तयार होत नाहीत, अशा वेळेस बांडगुळे स्वतः खेन्द्रिय पदार्थ तयार करून आपणास व आपल्या यजमानास पुरवितात. बांडगुळाची पाने हिरवी असल्यामुळे त्यास ह्या रीतीने अन्न तयार करितां येते. तेव्हां वृक्षादनी ( Parasites ) मुद्धा आपला नेहमीचा साधा नियम सोडून कधी कधी अन्य रीतीने अन्न मिळवितात. ह्याच मालिकेंत मांसाहारी वनस्पति येतात. कारण मांसहारी वनस्पति, किडे व कीटक खाऊन उपजीविका करितात. सेंद्रिय पदार्थ शरीरांत तयार करण्याचे भानगडीत न पडतां आयत्या तयार मांसान्नावर निर्वाह करणे त्यांस बरे वाटते. किडे अथवा कीटक फसून त्यांचे भक्ष्य व्हावेत, या कारणाकरितां निरनिराळे मधुरस त्यांच्या चमत्कारिक शरीराच्या भागांत सांठविले असतात. एकदा जे किडे मधुरसास लुब्ध होऊन त्यांचे पानांत घुसतात, ते पुनः सुटून बाहेर जाऊ शकत नाहीत. अशा वनस्पतींच्या पानांत निरनिराळी विशिष्ट रचना आढळते. काहींचा देठ पोकळ असून आत कांहीं पाचक आम्लें व रस असतात. किडे रस पिऊ लागले म्हणजे त्या आम्लाचे योगाने त्यांचे शरीर भाजून जातें, व हळु हळु ते कुजू लागते. शरीर पूर्ण कुजल्यावर वनस्पति त्याचा उपयोग करून घेतात. काही वनस्पति शरीर कुंजेपर्यंत वाट पहात नाहीत. किडे गुरफटून मेल्यावर आंतून पाचक आम्ल निघून त्या किड्यांचं