वर्षाचे सर्व ऋतूंत अथवा एका दिवसाचे सर्ववेळी मुळ्या आपले शोषणकाम सारख्या वेगाने चालवितात, असे नाहीं; कांहीं ऋतूत अथवा दिवसाचे कांहीं विशिष्टवेळी ते काम जोराने चालते; तसेच उलटपक्षी कांहीं वेळी ते मंद अथवा अगदी शिथिल होते. ह्याच फरकामुळे एका विशिष्ट ऋतूंत झाडांची वाढ मुळी होत नाही. कारण त्यावेळी मुळ्या आपले शोषणकाम फारच मंदरीतीने चालवितात. आतां असें कां होते, ह्याचे समर्पक उत्तर देणे फार कठीण आहे, व अजून त्यासंबंधी फारसे शोध झाले नाहींत. दिवसा व रात्री प्रकाश भिन्न भिन्न असल्यामुळे अथवा वर्षाचे ऋतूंत सारखा सूर्यप्रकाश नसल्यामुळे, त्याचा परिणाम मुळ्याच्या शोषक क्रियेवर होत असेल असे वाटते. कोवळेपणी शोषकपणामध्ये प्रकाशभिन्नत्वामुळे दिसणारा फरक फारसा आढळत नाही; पण जसा जसा जुनेपणा झाडांस येत जातो, त्याबरोबर हा फरकही दिसू लागतो.
पाण्याची वाफ होऊन सभोंवतालच्या हवेत मिसळणे ही बाष्पीभवनाचा नेहमीचा अर्थ होय. वनस्पतिशरीरांत ज्या पेशींचा हवेशी संबंध येते; त्या पेशींतून शरीरांत खेळणाऱ्या पाण्याची वाफ होऊन जेव्हां ती शरीराबरोबर हवेशीं मिसळते, त्यांसच वनस्पतीचे बाष्पीभवन म्हणतात. साधे बाप्पीभवन व वनस्पति-बाष्पीभवन ह्यांत फरक असतो. कारण एकाचा जीवनचरित्रावर कोणताही परिणाम होत नसून, केवळ पाण्याचे बिंदू बाष्परूप पावून हवेत मिसळतात. जसे ओले धोतर हवेत धरिलें असतां कांही वेळाने त्यांतील पाण्याचे कण धोतरांतून उडून हवेत मिसळतात, व आपोआप ते कोरडे होत जाते, अथवा हवेतील उष्णतेमुळे धोतरांतील पाण्याची वाफ होऊन ती वाफ हवेत मिसळून जाते व धोतर कोरडे होते, धोतर निजींव वस्तू असून ती कोरडी झाली एवढीच क्रिया कायती द्या साध्या बाष्पीभवनामुळे घडली. उन्हांत धोतर सारखं ठेविलें