पान:वनस्पतिविचार.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२ वे ].    बाष्पीभवन (Transpiration.)    ९९
-----



म्हणजे ते कोरडे होते. धोतराचे अंगांत ते लवकर वाळावें अथवा ते लवकर न वाळतां पुष्कळ वेळ तसेंच ओले रहावे, ह्यासंबधी व्यवस्था करण्याची कमी अधिक शाक्ति नसते. कारण बोलून चालून ते पडलें निर्जीव; पण सजीव वनस्पतीचे तसे नसते. वाफ कमी अधिक होऊ देणे. अथवा पाण्याचा सांठा कमी असेल तर फारशी वाफ होऊ न देतां ते पाणी पुष्कळ दिवस पुरविणे, अथवा जास्त पाणी असले तर त्याची अधिक वाफ करून हवेत सोडणे, वगैरे बाष्पीभवनांतील गोष्टी वनस्पति निर्जीव नसल्याची साक्ष पटवितात. म्हणजे बाष्पीभवनावर अंमल करणारी शक्ति वनस्पतिशरीरांत असुन ती आपले इच्छेनुरूप परिस्थिति लक्षात घेऊन बाष्पीभवन कमी अधिक होऊ देते. कारण ह्या बाष्पीभवनाचा परिणाम त्या वनस्पतींच्या जीवनचरित्रावर होत असल्यामुळे त्यास निराळे स्वरूप आलेले असते. बाकी वाफ होऊन हवेत मिसळणे हे साध्या बाष्पीभवनांत तसेच वनस्पति-बाष्पीभवनांत सारखेच असते. एकावर अंमल करणारी शक्ति असल्यामुळे ती वाफ करण्याची साधने कमी अधिक करून बाष्पीभवनावर आपला अंमल गाजविते; पण दुसऱ्यांत ती शक्ति नसल्यामुळे परिस्थितीचा अंमल उलट तिजवर चालतो.

 एका लहानशा भांड्यांत कांहीं मिश्रित पाणी उन्हात ठेविलें असतां बाष्पी भवन सुरू होते. मिश्र वस्तूपैकी ज्या वस्तू पाण्याचे बाष्पीभवनाबरोबर हवेत जाण्यासारख्या असतात, त्या पाण्याबरोबर वाफ होऊन हवेत मिसळताल, व बाकी उरलेले मिश्रण जास्त घन होतें. तसेच त्या घन रसांत शोषण शक्ति उत्पन्न होते. पाण्यात साखर, नायट्रिक, सल्फ्यूरिक तसेच फॉस्परिक आम्लें यांचे सूक्ष्म प्रमाण मिसळून उथळ भांड्यांत वरीलप्रमाणे हळू हळू सुर्यप्रकाशांत बाष्पीभवन होऊ दिलें असतां खाली भांड्यांत घन रस राहतो, व ह्या घनरसाच्या अंगी आपलें सभोवतालचे पदार्थातून पाणी शोषून घेण्याची शक्ति उत्पन्न होते. ह्याच तत्वानुसार वनस्पतीच्या बाह्य पेशीतून हवेत बाष्पी भवन होऊन पेशींतील द्रवरस घन होतो, व जवळच्या पेशींतून पुनः पाणी शोषून घेण्याची शक्ति त्या घनरसांत उत्पन्न होते. दोन पेशींत सारख्या घनतेचे पाणी असून एका पेशीतून पाण्याची वाफ होऊन हवेत जाऊं लागेल