________________
हयातीत स्वातंत्र्य, बंधुभाव व प्रेम यांचा विजय झालेला त्यांना पाहायला मिळो.
अनाथ, निराधार, बालगुन्हेगार बालकांचे संगोपन व पुनर्वसन कार्य म्हणजे केवळ अनाथ बालकांना वाचविणे व बालगुन्हेगारांना ‘सरळ करणे नव्हे. त्यांच्यातील प्रत्येकाला जगातील पहिल्या समाजसत्तावादी देशाचा नागरिक व भावी समाजाचा शिल्पकार बनविण्याचे ते कार्य होय. त्यासाठी एका नव्या शैक्षणिक दृष्टिकोनाची व नव्या शिक्षण पद्धतीची गरज आहे. या विचाराने प्रेरित होऊन रशियाने आपल्या बालकल्याण संस्थांचे जाळे विणले. त्यामुळे अनाथ, निराधार, अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या, कोर्टाने फारकत दिलेल्या जोडप्यांची मुले, टाकून, सोडून दिलेली मुले या सर्वांना शासनाकडून साहाय्य मिळू लागले. त्या काळात आई-वडील आजारी असल्यास, अपंग असल्यास, तुरुंगाची शिक्षा झालेली असल्यास इत्यादी अशा सर्वांच्या मुलांना साहाय्य देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बालकल्याणकारी संस्था पुढील कामे करीत -
अनाथ मुलांना जवळच्या नातेवाइकांच्या अथवा त्यांच्या पालकत्व स्वीकारणान्यांच्या ताब्यात देणे. अनाथ मुलांच्या दत्तक घेतलेल्या कुटुंबांना सक्रिय पाठिंबा देणे. व त्यांना विविध सवलती उपलब्ध करून देणे. माता व बालकल्याण संस्थांमध्ये मुलांना प्रवेश देणे. बालकांना वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा पुरविणे. स्वागत केंद्रात मुलांना तात्पुरता आश्रय देणे. शिशु-गृहे, आरोग्यधामे इ. ठिकाणी गरजेनुसार खाजगी रवानगी करणे. वस्तुरूपात व इतर साहाय्य बालकांना पुरविणे. मुलांना विविध व्यवसायात गुंतवणे. प्रशिक्षण केंद्रात त्यांना प्रवेश मिळवून देणे. निरीक्षक/शिक्षकांच्या देखरेखीखाली मुलांना पालकत्व मिळवून
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ० देणे. ।
या विविध कामांमुळे मुलांना आश्रय मिळाला. त्यामुळे भिक्षेगिरी, गुन्हेगारी इत्यादी प्रवृत्तींवर नियंत्रण बसण्यास मोलाची मदत झाली.
वंचित विकास जग आणि आपण/१०९