पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 मुलांना अनाथाश्रमात प्रवेश देऊन रशियन समाज व सरकारने सुटकेचा निश्वास सोडला नाही, तर अनाथाश्रमातून मुक्त झालेल्या मुलांची काळजी घेण्याची दक्षता सरकारने घेतली. अनाथाश्रम, बाल सुधारगृहे यातून वाढून मोठ्या झालेल्या तरुणांसाठी सरकारने विविध सवलती जाहीर केल्या. अशा मुलांना नोकरीची हमी होती. तो काळ औद्योगिक मंदीचा, बेकारीचा होता. अशा प्रतिकूल स्थितीतही रशियन सरकारने अनाथ, निराधार बालकांना नोकरीत राखीव जागा ठेवल्या.
 संस्थेतील मुलांना मॉस्को व इतर मोठ्या शहरांत उच्च शिक्षणाची सोय केली. महाविद्यालयात प्रवेश घेणाच्या अनाथ विद्याथ्र्यांना तर प्रवेशाची आगाऊ पावती मिळत असे. शिवाय प्रवास, कागदपत्र, उदरनिर्वाहासाठीचा सारा खर्च सरकार करी. अशा विद्याथ्र्यांना महाविद्यालयात विशेष शिष्यवृत्ती दिली जात असे. शिक्षित, प्रशिक्षित मुलांसाठी सरकार स्वतः नोकरी शोधून देत. त्यासाठी कारखाने, कंपनी इ. शी सरकार करार करी व नोकरीच्या अटी, वेतन, सेवा सुरक्षा इत्यदीची हमी घेत असे. रशियात सरकारी तत्त्वावर शेती व्यवसाय केला जातो. ज्या मुलामुलींना शेतीची आवड आहे त्यांना सहकारी संस्थांत पाठविण्यात येईल. इतरांबरोबर या मुलींना वागणूक मिळावी म्हणून सरकार दक्ष असे. या मुलांचा सांभाळ कुटुंबातील इतर मुलांबरोबर व्हावा म्हणून सरकार दत्तक कुटुंबास अतिरिक्त जमीन, ठरावीक रक्कम आणि करात सवलती देत असे.

या मुलांच्या वैद्यकीय उपचाराची जबाबदारी ही रशियन सरकारने चोख केली होती. स्वागत केंद्रात मुलगा येताच त्याची वैद्यकीय तपासणी घेण्यात येई. वैद्यक सल्ल्यानुसार त्याला त्वरित उपचार देण्यात येत असत. त्वचारोग, क्षय, इत्यादी आढळल्यास खास रुग्णालयात विद्याथ्र्यांना पाठविण्यात येई. सांसर्गिक रोग होऊ नये म्हणून पूर्ण दक्षता घेण्यात येत असे. जी मुले दत्तक कुटुंबात असत, त्यावर देखील सरकारी परिचारिकेची देखरेख असायची. अशा कुटुंबातील प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी व्हायची.
 आपल्या देशातील अशा मुलांना मिळणाच्या सोयी-सवलतींच्या तुलनेत स्वप्नवत वाटणारे हे चित्र. यासाठी त्यांनी इतका पैसा कोठून आणला असा प्रश्न उभारणे साहजिकच आहे. १९२४ साली ऑक्टोबर क्रांतीचे नेते ब्लादिमीर लेनिनचे निधन झाले. अनाथ मुलांचे संगोपन हा लेनिनचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनाथ मुलांच्या मदतीसाठी निधी उभारण्यात आला. निधीचे लक्ष्य १० कोटी रुबल्स ठरविण्यात आले होते. पैकी ५ कोटी

वंचित विकास जग आणि आपण/११०